महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साधणार जनतेशी संवाद;

काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष.

टीम विजयदिप न्यूज.

            राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याचे समजते. त्यामुळे आज ते कांही मोठा निर्णय घेणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या संवादाकडे कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

            राज्यात कोरोनाचा वाढता धोका त्यावरती उपाययोजना, विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर होणारे आरोप, मेट्रो कारशेड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले पत्र, नाताळ, नववर्षाचं स्वागत याबरोबरच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होणार का? याकडे देखील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याचे व या संवादातून काय चर्चा झाली आणि त्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्व जनतेचे लक्ष असणार आहे. 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!