‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी’च्या ३,०१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन.

टिम: विजयदिप न्यूज
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये उत्पादित झालेल्या ३ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ सुरळीत सुरु असून या हंगामात कारखान्याच्या इतिहासातील कमी कालावधीत सर्वोच्च गाळप, सर्वोच्च साखर उत्पादन व सर्वोच्च आसवनी प्रकल्पाच्या उत्पादनाची नोंद झाली असून हे सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कार्यकारी संचालक, अधिकारी, कामगार व संचालक मंडळ इत्यादींनी घेतलेल्या परिश्रामामुळे शक्य झाले आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या हंगामात कारखान्याचे गाळप अखंडीत सुरु असून कारखान्याकडे नोंदलेला संपुर्ण ऊस वेळेत गाळप केला जाईल. त्याचप्रमाणे गाळप झालेल्या ऊसाचे पेमेंट वेळेत अदा करीत आहोत. या हंगामात कारखान्याचे ४२ दिवसात ३ लाख २६ हजार ८९६ मे.टन ऊसाचे गाळप केले असून ३ लाख १ हजार १११ क्विं. पोती साखर उत्पादन केली आहेत. को-जनरेशन मधून २.०७ कोटी युनिट विज निर्मीती केली असून आसवनी प्रकल्पामधून ३६ लाख लि.उत्पादन घेतले आहे.
डॉ.यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक.