महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

‘पांडुरंग सहकारी’कडून शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज बँकेत वर्ग.

ऐच्छीक ठेवीमुळे ठेवीदारांना अधिकचे उत्पन्न.

विजयदिप न्यूज.

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम कारखाना प्रत्येक वर्षी देत असतो. कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जमा असणाऱ्या सुमारे १२ कोटी ६८ लाख ठेवीवर द.सा.द.शे.८ टक्के प्रमाणे  रक्कम रु.९३ लाख ठेवीदाराच्या विविध बँकेमधील खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

योवळी कारखान्याचे व्हा.कैलासराव खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले असून सोलापूर जिल्हात सातत्याने सर्वाधिक ऊसदर दिलेला आहे. कै.सुधाकरपंत परिचारक यांचा आदर्श घेवून कारखान्याच्या सभासदांना प्रत्येक वर्षी व्याज बिल दिले जात असून यावर्षीही  ठेवीदारांना  व्याज बील दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच ठेवीदारांनाही दिलासा मिळाला आहे. सध्या बँकाकडून ठेवीवर ५ ते ६ टक्के इतके व्याज दिले जाते. परंतू पांडुरंग कारखान्याकडून बँकांच्या व्याजापेक्षाही ज्यादा म्हणजेच ८ टक्के इतका व्याजदर ठेवीदारांना दिला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एच्छिक ठेवी कारखान्याकडे ठेवाव्यात म्हणजे त्यांना व्याजाचे रक्कमेतून चांगले उत्पन्न मिळेल.

कारखाना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये उच्चांकी गाळप क्षमतेने सुरु असून या हंगामात १२ लाख मे.टन ऊस गाळप करणेचे उदिष्ट कारखान्याने ठेवलेले आहे. या हंगामात पांडुरंग कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाचे प्रति टन रु.२ हजार ४०० प्रमाणे पेमेंट केले असून एफ आर पी प्रमाणे संपुर्ण पेमेंट करणार असून तोडणी व वहातुक ठेकेदारांच्याही बिलाच्या रक्कमाही वेळेवर अदा करीत आहोत. कारखाना चालू गळीत हंगामात प्रतिदिन ७ हजार ५०० मे.टन गाळप करीत असून कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प वाढीव ९० के.एल.पी.डी. क्षमतेने व्यवस्थीतपणे सुरु आहे, को-जनरेशनही सुरळीत सुरु असून त्यामधूनही जास्तीत जास्त विज निर्यात केली जात आहे.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सागीतले की, कारखान्याचा पुढील गाळप हंगाम २०२३-२४ हा वाढीव गाळप क्षमतेने चालविणेसाठीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. चालू हंगाम बंद होताच त्याअनुषंगाने नुतनीकरणाचे काम जलदगतीने सुरु होऊन कारखान्याचा पुढील गळीत हंगाम सुरुवातीपासूनच वाढीव क्षमतेने चालणार आहे. चालू गळीत हंगाम चेअरमन प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन कैलास खूळे व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने कारखाना इतिहासातील सर्वोच्च गाळप क्षमतेने सुरु आहे.

यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील, आदि उपस्थित होते.

सध्या बँकाकडून ठेवीवर ५ ते ६ टक्के इतके व्याज दिले जाते. परंतू पांडुरंग कारखान्याकडून बँकांच्या व्याजापेक्षाही ज्यादा म्हणजेच ८ टक्के इतका व्याजदर ठेवीदारांना दिला आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एच्छिक ठेवी कारखान्याकडे ठेवाव्यात म्हणजे त्यांना व्याजाचे रक्कमेतून चांगले उत्पन्न मिळेल.

मा.आ.प्रशांतराव परिचारक,

चेअरमन, श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!