‘नागेश साळुंखे क्रिकेट क्लब’चा दणदणीत विजय.

‘आर. एन क्रिकेट क्लब’वर ६८ धावांनी मात.
टिम विजयदीप न्यूज.
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे कै.जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ‘शांभवी चषक’ २०२५ या १४ वर्षाखालील मुलांच्या (बाद फेरी) क्रिकेट स्पर्धेत शनिवार (२८) जून रोजी झालेल्या सामन्यात पंढरपूर येथील ‘नागेश साळुंखे क्रिकेट क्लब’ने, आर. एन क्रिकेट क्लब, पंढरपूरचा ६८ धावांनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला.

नाणेफेक जिंकून ‘नागेश साळुंखे क्रिकेट क्लब’ने प्रथम फलंदाजी करताना ३६ षटकात सर्व बाद १४६ धावांची खेळी केली. तर १४६ धावांचा पाठलाग करताना केवळ ७८ धावत आर. एन क्रिकेट क्लब, पंढरपूरचा संघ बाद झाला.
प्रथम फलंदाजी करताना ‘नागेश साळुंखे क्रिकेट क्लब’च्या वीर गायकवाड ने २७ चेंडूत २४ धावा, यशराज लटके ३४ चेंडूत २३ धावा तर संस्कार फाटे ३८ चेंडूत २१ धावांची खेळी केली. तसेच ‘आर. एन. क्रिकेट क्लब’कडून गोलंदाजी मध्ये समर्थ रोंगे यांने ५ षटकात केवळ १६ धावा देऊन ३ बळी मिळविले तर वीर कोळेकर ८ षटकात १९ धावा देऊन २ बळी व समर्थ ठोंबरे यांने ७ षटकात १७ धावा देऊन २ बळी घेतले.
आर. एन क्रिकेट क्लब कडून फलंदाजीमध्ये वीर कोळेकर २० धावा, समर्थ ठोंबरे १४ धावा तर रुद्र चौगुले याने १३ धावा केल्या. सुरवातीचे तीन फलंदाज वगळता आर. एन क्रिकेट क्लबचे ६ फलंदाज केवळ ५ धावात बाद झाले. दरम्यान नागेश क्रिकेट क्लब कडून गोलंदाजी करताना अविनाश गरड ८ षटकात ३ निर्धाव षटके टाकून केवळ १० धावांच्या मोबदल्यात २ फलंदाज बाद केले. तर यशराज लटके २.४ षटकात १ निर्धाव षटक टाकून केवळ ३ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाज बाद केले. तसेच कार्तिक पाटोळे यांने ८ षटकात २ निर्धाव षटक टाकून २४ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाज बाद केले.
सामनावीर पुरस्कार अविनाश गरड याला देण्यात आला.
