धरण पाणीसाठा

सावधान: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणार.

टीम विजयदिप न्यूज.

उजनी धरणाच्या धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावलेले असून उजनी धरण सध्या १०८.३१ टक्के झाले असल्यामुळे व उजनी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस सुरु असल्यामुळे दौंड येथुन उजनीत येणार्‍या पाण्याची आवक वाढत आहे. अशा परिस्थितीत उजनीच्या पाणीसाठा झपाट्याने वाढण्याची शक्यात असल्यामुळे व पुरनियंत्रणासाठी धरणाच्या सांडव्यामधुन आज रात्री ९ वाजल्यापासून ५ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार यात कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडुन देण्यात आली आहे.

दरम्यान नीरा खोऱ्यातील वीर धरणातून सुद्धा नीरा नदीत ४६३७ क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे. तसेच माळशिरस तालुक्यात आज सायंकाळ पासूनच दमदार पाऊस चालू असल्यामुळे नीरा व भीमा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात पावसाच्या प्रमाणानुसार वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!