धरण पाणीसाठा

वीर धरनामधून निरा नदीत विसर्ग सोडला.

नदीकाठच्या सर्वांना सतर्कतेचा इशारा.

टीम विजयदीप न्यूज.

नीरा खोर्‍यातील गुंजवणी, नीरा-देवघर, भाटघर व वीर ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून सर्व धरणात मिळून एकूण ४८.३३ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असल्यामुळे धरणामधील पाणीपातळी स्थिर ठेवणे गरजेचे आहे. परिणामी वीर धरणाची पाणीपातळी स्थिर करण्यासाठी वीर धरणामधून निरा नदीत आज बुधवार दि.०६ ऑक्टोबर रोजी सायं.७ वाजलेपासून ४ हजार ६३७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यास सुरवात झालेली आहे.

तसेच धरणात येणार्‍या आवक नुसार व पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नीरा नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असा सतर्कतेचा इशारा सर्वांना प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.

बुधवार दि.०६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा. नीरा खोर्‍यातील धरणांची स्थिति.

धरणांची नावेपाणीसाठा (TMC)टक्केवारी
गुंजवणी३.६९१००
निरा-देवघर११.७३१००
भाटघर२३.५०१००
वीर९.४११००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!