धरण पाणीसाठा

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी अखेर १०० टक्के भरले…

आता वाटचाल १११ टक्क्याच्या पल्याकडे.

४२ वर्षात ३७ वेळा पूर्ण क्षमतेने भरले धरण.

टीम विजयदिप न्यूज.

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण बर्‍याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काल मंगळवार दि.०५ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वाजता १०० टक्के भरले. त्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता उजनीची वाटचाल १११ टक्याच्या पल्याकडे सुरू झाली असून धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धरणाच्या इतिहासात ४२ वर्षात धरण पुर्ण क्षमतेने भरण्याची ३६ वी वेळ आहे.

दरम्यान आज बुधवार दि.०६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उजनी धरण १००.६७ टक्के एवढे झाले असून धरणात एकूण पाणीसाठा ११७.५९ टीएमसी झालेला आहे. तसेच येत्या कांही दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाची टक्केवारी १११ टक्के (१२३ टीएमसी) होणे अपेक्षित आहे.

यावर्षीच्या पावसाळी हंगामात मान्सून सुरू झाल्यानंतर जोरदार पावसाची अपेक्षा होती, मात्र मान्सूनमध्ये अडखळत पणा निर्माण झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला नाही. तसेच भीमा खोर्‍यात यावर्षी अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. परिणामी उजनीत यावर्षी दौंड येथून येणारा विसर्ग कमी प्रमाणात येत होता. त्यामुळे उजनी धरण भरण्यास यावर्षी विलंब लागला. सद्या परतीचा पाऊस सुरू असून पाणलोट क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे संथगतीने का होईना उजनीने १०० टक्क्याचा आकडा पार केला.

आज बुधवार दि. ०६ ऑक्टोंबर स. ६ वा. चे उजनी अपडेट पाणी पातळी ४९६.८६० मी., एकूण पाणीसाठा ३३३०.१४ द.ल.घ.मी (११७.५९ टीएमसी), उपयुक्त पाणीसाठा १५२७.३३ द.ल.घ.मी (५३.९३ टीएमसी), टक्केवारी १००.६७%, दौंड विसर्ग ७१६३ क्युसेक्स.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!