महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी.

टीम विजयदिप न्यूज.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील करकंबचा पूर्व भाग, बार्डी आणि जाधववाडी भागास सोमवारी दि.१३ एप्रिल रोजी सायं. वादळी वारे आणि अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने झालेल्या फळबागांच्या नुकसानीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार दि.१४ एप्रिल रोजी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर दौर्‍यावर होते ते करकंब मार्गे पंढरपूरला जात असताना त्यांनी नुकसानग्रस्त भागातील बार्डी येथील भारत बनकर व अनिल कवडे यांच्या बेदाणा शेडची तर दिनकर कवडे यांच्या पडलेल्या द्राक्षबागेची पाहणी केली तसेच करकंब येथील राहुल शिंगटे आणि दिलीप व्यवहारे यांच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत करमाळ्याचे आ.संजय शिंदे, सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, रणजितसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत, उपसरपंच आदिनाथ देशमुख, दिनकर कवडे, तलाठी रुक्मिणी पांढरे व चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अचानक आलेल्या वादळी वारे व अवकाळी पावसाने या भागातील द्राक्षे व डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला आहे. अनेक बेदाणा शेडवरील झाकलेला प्लास्टिक कागद उडून गेल्याने बेदाण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. उतरणीला आलेल्या द्राक्षबागा आडव्या झाल्या असून बागांमध्ये द्राक्ष घडांचा खच पडला होता.

यावेळी पिकविम्या प्रमाणे बेदाणा शेडला विमा संरक्षण मिळावे, नुकसानग्रस्तांना भरीव मदत मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली.

अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पाहून येथील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने कोणतीही घोषणा करू शकत नाही. तरीही लवकरात-लवकर पंचनामे करून घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी प्रशासनास दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!