ऊस उत्पादनात भारत जगात थोड्या दिवसांमध्ये प्रथम क्रमांकावर.- साखर आयुक्त शेखर गायकवाड

‘पांडुरंग सहकारी’ कारखान्यास साखर आयुक्तांची सदिच्छा भेट.
टिम: विजयदिप न्यूज.
भारतामध्ये उसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागले आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात भारत जगात थोड्या दिवसांमध्ये प्रथम क्रमांकावर जाईल असा विश्वास साखर आयुक्त शेखर गायकवाड व्यक्त केला ते श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपुर या कारखान्यास भेट देऊन झूमलॉयन या कंपनीच्या ऊस तोडणी यंत्राच्या भारतामधील पहिल्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. त्यावेळी बोलत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक, आ.बबनराव शिंदे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली की, जगामध्ये भारत थोड्या दिवसांमध्ये प्रथम क्रमांकावर ऊस उत्पादनात जाणार आहे. भारतामध्ये ऊसाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ऊस क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तोडणी मजुरांची कमतरता जाणवत आहे. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता कारखान्याकडे ऊस उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी वाहतूक यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ऊस तोडणीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. जास्तीत-जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्र विकत घेऊन कारखान्यास ऊस तोडणी वाहतूक करून पोहोच करणे ही भविष्यात काळाची गरज होणार आहे. त्यासाठी तोडणी यंत्र खरेदीसाठी आवश्यक असणारी शासकीय मदत साखर आयुक्त कार्यालयाकडून केली जाईल. अशी ग्वाही आयुक्त गायकवाड यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण बेरोजगार असून त्यांना नोकरी नाही. अशा तरुणांनी तोडणी वाहतूक यंत्र खरेदी करून त्यामधून आर्थिक प्रगती साधून एक चांगला उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. दिवसें-दिवस ऊस तोडणी साठी तोडणीसाठी मजूर मिळेनासे झालेले आहेत. तोडणी वाहतूक यंत्र खरेदी करणाऱ्या खरेदीदारास कारखाना हवी ती मदत करेल प्रसंगी बँक कर्जासाठी हमी देण्याचेही काम कारखाना स्तरावर करण्यात येईल. त्याचप्रमाणे झूमलॉयन या कंपनीने आयोजित केलेल्या तोडणी वाहतूक यंत्राच्या प्रात्यक्षिकास उपस्थित राहणा-या सर्वांचे आभार मानले.
माढ्याचे आ.बबनराव शिंदे यांनीही सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या ऊसाच्या क्षेत्राचा आढावा घेऊन. ऊस तोडणीसाठी येणाऱ्या अडचणी बाबत ऊहापोह केला.
कार्यक्रमास दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे कार्यकारी संचालक रंजनभाऊ गिरमे, चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सदगुरू कारखान्याचे व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर, फत्तेसिंह माने-पाटील, पांडुरंगभाऊ देशमुख, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, दिलीपराव चव्हाण, तानाजी वाघमोडे, ज्ञानदेव ढोबळे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगामामा विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील, कारखान्याचे केन मॅनेजर संतोष कुमठेकर व ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास सालगुडे-पाटील यांनी केले. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही तोडणी यंत्रांची माहिती दिली.