महाराष्ट्र

शेतकऱ्यांना पूरग्रस्त की,अतिवृष्टीग्रस्त म्हणून अनुदान मिळाले या संदर्भात मोठा संभ्रम.- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील.

कर्जमाफी शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळण्यासंदर्भात मोठ्या त्रुटी राहिल्या आहेत.- आ.मोहिते-पाटील.

टीम विजयदिप न्यूज.

राज्य शासनाने  जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळण्यासंदर्भात मोठ्या त्रुटी राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज रोखे थांबले आहेत. शेतकऱ्यांना पूरग्रस्त म्हणून अनुदान मिळाले की, अतिवृष्टीग्रस्त म्हणून अनुदान मिळाले या संदर्भात मोठा संभ्रम आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढावा असे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सरकारला दिले. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. परंतु त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना सरसकट मिळाला नाही. त्याशिवाय ज्या शेतकऱ्यांकडे २ लाखांच्या वर कर्ज आहे अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी त्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सोसायटी व बँक पातळीवर पूर्ण झाले आहे. मात्र शासन स्तरावरून या संदर्भात आणखी कोणतेही हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे कर्जरोखे थांबले आहेत. ही महत्त्वपूर्ण बाब आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

            सन २०१९ साली सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी पिकांसकट वाहून गेल्या, घरे -जनावरे वाहून गेली. त्यानंतर अतिवृष्टीचा फटकाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसला. पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे शासनाकडून झाले. मात्र ज्या शेतकऱ्यांना पूरग्रस्त म्हणून मदत मिळाली त्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. ज्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले त्यांना पूरग्रस्त म्हणून मदत मिळाली नाही. आणि असे अनेक शेतकरी आहेत की ज्यांना दोन्ही आपत्ती संदर्भात कसलीही मदत मिळाली नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. भाजपचे दुसरे आ.प्रशांत परिचारक यांनीही पूरग्रस्तांना मदत मिळाली नसल्याचे यावेळी सांगितले. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा राज्यपातळीवरील मुद्दा असून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यासंदर्भात त्यांच्या दालनात स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावा असे आदेश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यासंदर्भात सभागृहाला दिलेली माहिती आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले ते म्हणाले की ९ सप्टेंबर २०२० रोजी निघालेल्या अध्यादेशानुसार पूरग्रस्तांसाठी २ हजार २९७ कोटी वाटण्यात आले आहेत. त्यानंतर ७ जानेवारी २०२१ रोजी निघालेल्या अध्यादेशानुसार पिकहानीसाठी २ हजार १९२ कोटी दिले आहेत. असे मिळून राज्यातील ५७ लाख शेतकऱ्यांना ४ हजार ४८९ कोटींची मदत देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील ४ लाख ८९ शेतकऱ्यांना ५४५ कोटींचे वितरण झाले आहे. त्यापैकी ४४२ कोटी शेती पिक नुकसानीसाठी व उर्वरित १०३ कोटी इतर नुकसानीसाठी दिले आहेत. तरीदेखील जिथे राहिले असेल तेथे त्याची माहिती घेऊन मदत दिली जाईल असे प्राजक्त तनपुरे यांनी सभागृहासमोर सांगितल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!