पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणार- निनाद पाटील.

माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निनाद पाटील यांची निवड.
विजयदीप न्यूज.
पत्रकार संघाच्या माध्यामातून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे व तालुक्यात पत्रकार भवन उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मत माळशिरस तालुका पत्रकार संघाचे नुतून अध्यक्ष पत्रकार निनाद पाटील यांनी व्यक्त केले.
माळशिरस तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली असून संघाच्या अध्यक्षस्थानी दै.पुण्यनगरी चे पत्रकार निनाद पाटील यांची तर नातेपुते येथील दै.सुराज्य चे प्रतिनिधि मनोज राऊत व पिलीव येथील दै.पुण्यनगरी चे प्रतिनिधी उदय कदम यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या पहिल्या कार्यकारणी ला दोन वर्षे पूर्ण झाली असल्याने नव्या कार्यकारणी ची निवड करण्यासाठी शुक्रवारी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.विनोद बाबर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये कार्याध्यक्षपदी एल.डी वाघमोडे, सचिवपदी संजय हुलगे, सहसचिव लक्ष्मण राऊत, खजिनदार दिनेश माने-देशमुख, प्रवक्ते बंडू पालवे, प्रसिद्धी प्रमुख शाहरुख मुलाणी यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार अॅड.जी.पी कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर नूतन अध्यक्ष निनाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर, समाधान काळे, अहील पठाण यांनी सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना कायदेशीर सल्लागार अॅड.जी.पी कदम म्हणाले, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. दोन वर्षात पत्रकार संघाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार घेऊन त्यांना प्रोत्साहित केले आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजीक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या फेसबुक लाईव्ह व्दारे मुलाखत घेऊन सामाजिक प्रश्नावर रोखठोक चर्चा घडवुन आणण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम राबिवला असून यापुढे ही असे अनेक उपक्रम राबविण्यात यावेत असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा.विनोद बाबर, धनंजय पवार, संजय देशमुख, जयराम घाडगे, नितीन मगर, शिवम कांबळे यासह तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.