इतर

सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा!

स्वाभिमानी, रयत क्रांती, वंचित बहुजनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

विजयदिप न्यूज.

यावर्षीच्या पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यात पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. याचा विचार करून शासनाने सोलापूर जिल्हा लवकरात-लवकर दुष्काळ जाहीर करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरेल असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्त रीत्या जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले.

संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्यामुळे जळून गेली आहेत. जनावरांना चारा नाही. सरकारने अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. तरी जनावरांसाठी चारा डेपो उपलब्ध करून तूर, मका, कांदा या पिकासह २५% अग्रीम देण्यासंदर्भात आदेश दिला आहे. वास्तविक संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलेला असताना त्यामध्ये उडीद, मुग याचा समावेश होणे गरजेचे आहे. तूर, मका, कांदा यांचा समावेश केला गेला तरी उडीद, मुग ही पिके वगळली आहेत. तरी उडीद, मुग याला २५% अग्रीम रक्कम देण्यात यावी.

सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना व बहुजन वंचित आघाडी यासह शेतकरी व अनेक संघटनांच्या वतीने दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर(तात्या) माने-देशमुख, बहुजन वंचित आघाडीचे गोपाळ(काका) घार्गे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे राहुल बिडवे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, रयत क्रांती संघटनेचे आदित्य गरड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!