विजयदिप न्यूज.
कोरोना व अतिवृष्टी यामुळे सर्वजण हवालदिल झालेले आहेत. अशा परिस्थितीत फायनान्सच्या वसुलीवरती कांही दिवस निर्बंध आणावेत व योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी आशा आशयाचे निवेदन रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
कोविड-१९ च्या कालावधीत लाँकडाउन असल्यामुळे शेती, जोडधंदा, छोटे-मोठे उद्योग , दळणवळण इत्यादी व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत गावा-गावातील महिलांनी मायक्रो फायनान्स कर्ज उचलून छोटे-मोठे व्यवसाय चालू केले. मात्र सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे कर्जाचे सर्व हप्ते थकले आहेत. अशातच मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी तगादा लावला असून काही ठिकाणी महिलांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे रणजीत चव्हाण, सुधाकर पांढरे, रणजीत पाटील, राजू ठोकळे आदी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!