महाराष्ट्र

मागील वर्षाच्या तुलनेत धरणातील पाणीसाठे कमीच.

उजनीत १.६८, नीरा देवघर २.८१ तर वीर ०.७९ टीएमसी पाणीसाठा कमी.

भाटघर मध्ये २.२० टीएमसी पाणीसाठा जास्त.

टीम विजयदिप न्यूज.

      सोलापूर जिल्हयातील सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी तसेच औद्योगिक करणास लागणार्‍या पाण्यासाठी महत्वाची असलेल्या नीरा खोर्‍यातील नीरा-देवघर, वीर तसेच भीमा खोर्‍यातील उजनी धरणात मागील वर्षाच्या तुलनेमध्ये पाणीसाठा कमी आहे. यामुळे या धरणाच्या पाण्याचे आत्तापासूनच नियोजन करण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे.

      मागील वर्षी दि.५ फेब्रुवारी २०२० रोजीच्या तुलनेत यावर्षी दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी नीरा देवघर धरणात २.८१ टीएमसी, वीर धरणात ०.७९ टीएमसी तर सोलापूर जिल्हयासाठी वरदायी असणार्‍या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.६८ टीएमसी एवढा कमी झालेला आहे.

      याउलट नीरा खोर्‍यातील भाटघर २.२० टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.

      धरणातील पाणीसाठे कमी झालेले आहेत, त्यामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामात सिंचनासाठीच्या पाण्यासाठी ओढाताण होणार का काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे.

      सन २०१९ च्या तुलनेत मागील वर्षी सन २०२० मध्ये कालवा लाभक्षेत्रात पाऊस जास्त झालेला होता. तसेच भीमा खोर्‍यातील उजनी धरणावरती पर्जन्यमान जास्त झाले होते. परंतु नीरा खोर्‍यातील नीरा देवघर, भाटघर व वीर धरणावरती सन २०१९ च्या पावसाळ्याच्या तुलनेत सन २०२० मध्ये पर्जन्यमान कमी झालेले होते.

धरणावरती झालेल्या पर्जन्यमानाचा तुलनात्मक तक्ता.

अ.नंधरणाचे नाव१.६.२०१९ ते ५.२.२०२० पर्यंतचा पाऊस.१.६.२०२० ते ५.२.२०२१ पर्यंतचा पाऊस. १.६.२०१९ ते ५.२.२०२० च्या तुलनेत १.६.२०२० ते ५.२.२०२१ पावसाची तफावत.
उजनी४९३ मिमी१०१३ मिमी५२० मिमी जास्त
नीरा देवघर३७९९ मिमी२०९२ मिमी१७०७ मिमी कमी
भाटघर१७५४ मिमी११४५ मिमी६०९ मिमी कमी
वीर८८३ मिमी७३४ मिमी१४९ मिमी कमी

      सद्या नीरा खोर्‍यातील वीर धरनामधून रब्बी हंगामातील आवर्तन सुरू असून नीरा उजव्या कालव्यास १ हजार ५५० क्युसेक्स तर नीरा डावा कालव्यास ८२७ क्युसेक्स ने पाणी सुरू आहे.

 तर भीमा खोर्‍यातील उजनी धरनामधून कालव्यास ३ हजार ४०० क्युसेक्स ने रब्बी हंगामातील आवर्तन सुरू आहे.

      उजनी धरनामधून १९ जानेवारी २०२१ रोजी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तर २० जानेवारी २०२१ रोजी कालव्यामधुन सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आलेले आहे. २० जानेवारी रोजी उजनी धरणाची टक्केवारी १०४.१२ टक्के तर उपयुक्त पाणीसाठा ५५.७८ टीएमसी एवढा होता. उजनी मधून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी ३० जानेवारी रोजी बंद करण्यात आले आहे. तर कालव्यातून रब्बीचे आवर्तन सुर आहे. २० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ या १५ दिवसाच्या कालावधीत उजनी धरणाची टक्केवारी १०४.१२ टक्क्यावरून ८४.८५ टक्क्यावरती तर उपयुक्त पाणीसाठा ५५.७८ टीएमसी वरुन ४५.४६ टीएमसी वरती म्हणजेच जवळपास १०.३२ टीएमसी एवढा कमी झालेला आहे.  

अ.नंधरणाचे नाव५.२.२०२० टक्केवारी५.२.२०२० चा उपयुक्त साठा.५.२.२०२१ टक्केवारी५.२.२०२१ चा उपयुक्त साठा.
नीरा देवघर९४.८६११.१२ टीएमसी७०.८५८.३१ टीएमसी
भाटघर८१.१६१९.०७ टीएमसी९०.४९२१.२७ टीएमसी
वीर६४.४४६.०६ टीएमसी५६.०७५.२७ टीएमसी
उजनी८८४७.१४ टीएमसी८४.८५४५.४६ टीएमसी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!