माळशिरस तालुकाशेतीविषयक

राष्ट्रीय दूध दिनानिमित्त कृषीकन्यांनी पटवून दिले स्वच्छ दूध उत्पादनाचे महत्त्व.

टिम: विजयदिप न्यूज

राष्ट्रीय दूध दिनाचे औचित्य साधून चौंडेश्र्वरवाडी (ता.माळशिरस) येथे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना स्वच्छ दूध उत्पादनाचे महत्त्व पटवून दिले.

राष्ट्रीय दूध दिन डॉ.वर्गीस कुरियन (भारताचे ‘मिल्क मॅन’) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. त्यांना ‘भारतातील श्वेतक्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाते. ते त्यांच्या ‘ऑपरेशन फ्लड’साठी प्रसिद्ध आहेत, जो जगातील सर्वात मोठा कृषी कार्यक्रम म्हणून ओळखला जातो.

राष्ट्रीय दूध दिनाचे औचित्य साधून कृषीकन्या स्नेहल शिंदे, कोमल देवकते, प्रगती सालगुडे, प्राची जाधव, पूजा घाडगे, काजल वळकुंडे, अपेक्षा धापटे, रोहिणी कांबळे यांनी शेतकऱ्यांना स्वच्छ दूध उत्पादनाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याच बरोबर दूध उत्पादन, सेवन यांचे महत्त्व पटवून दिले.

दुधात पुष्कळ पोषक द्रव्ये आढळतात जी शरीरासाठीही खूप महत्वाची असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन-ई, डी, के आणि ए आढळतात. शिवाय, मॅग्नेशियम, आयोडीन, फॉस्फरस, कॅल्शियम, राइबोफ्लेविन देखील दुधात आढळतात, म्हणून लहानपणापासूनच दुधाचे सेवन मुलांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी देखील हे आवश्यक आहे. त्यामुळे सेवन केले जाणारे दूध स्वच्छ असावे याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.   

या प्रात्यक्षिकासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी एच.एस.खराडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!