माळशिरस तालुकाशेतीविषयक

कृषी क्षेत्रासाठी कृषी पदवीधरांचे महत्त्वपूर्ण योगदान- आ.रणजितसिंह मोहिते-पाटील

अमन ॲग्रो सर्विसेसचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

टिम: विजयदिप न्यूज

कृषी क्षेत्रासाठी कृषी पदवीधर महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे मत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले ते महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या हद्दीतील गट नंबर २ विभागात सुरू करण्यात आलेल्या अमन ॲग्रो सर्विसेस या दुकानाचे उद्घाटन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलत होते.

येथील अमन मुलाणी यांनी अमन ॲग्रो सर्विसेस सुरू केले असून त्याचे उद्घाटन आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सहकार महर्षी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र सावंत-पाटील,  श्री.पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, सुभाष जाधव, अकलूज बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे, पांडुरंग कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन नितीनराजे निंबाळकर, युवा नेते डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, नगरसेवक तानाजी भगत, अशोक नवले, डॉ.रणजितसिंह निंबाळकर, कृषी तज्ञ आयाज शेख, सादिक तांबोळी, माजी सैनिक संघटनेचे महादेव देवकर, शेतीनिष्ठ कुबेर रेडे, विनायक पराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कृषी क्षेत्राशी संलग्नित शेतकरी नागरिक उपस्थित होते. कृषी क्षेत्रात नारळ निर्यातीला चांगला वाव असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी सांगितले.

सूत्रसंचालन दत्ता माने यांनी केले तर अमन मुलाणी यांनी आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!