श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या १ लाख ५१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन.

प्रतिनिधी/विजयदिप न्यूज
श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये उत्पादित झालेल्या १ लाख ५१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदि उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ हा २६ ऑक्टोबर रोजी सुरु झाला असून कारखान्याने २७ दिवसात १ लाख ५६ हजार २८७ मे.टन ऊसाचे गाळप करुन १ लाख ५१ हजार १११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्याचबरोबर कारखान्याचा दैनंदिन साखर उतारा ११.१६ टक्के असून सरासरी साखर उतारा १०.१३ टक्के आहे.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच कारखान्याचे कामकाज सुरु असून त्याचप्रमाणे पुढेही अखंडीतपणे सुरु राहील. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाचा पहिला हप्ता प्रति मे.टन रु.२ हजार ४०० प्रमाणे अदा केला असून १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची ऊस बिले अदा केलेली आहेत. याचप्रमाणे पुढील ऊस बिलेही अदा करणार आहोत. कारखाना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये प्रतिदिन सरासरी ७ हजार मे.टनाने गाळप करणार असून या हंगामापासून कारखान्याचा आसवनी प्रकल्पही ९० के.एल.पी.डी. क्षमतेने चालवित आहोत असेही चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक म्हणाले.
चालू हंगामात सिरप ते इथेनॉलचे उत्पादन नुकतेच सुरु झालेले आहे. त्यामुळे कारखान्याच्या गाळपामध्ये वाढ होवून कारखान्याचे ऊस गाळप वाढणार आहे. या हंगामातही कारखान्याचे उच्चांकी गाळप, उच्चांकी साखर उत्पादन करण्याचे उदीष्ट आहे. तसेच या हंगामापासून नव्याने आसवनी प्रकल्पाच्या स्पेंटवॉश पासून पोटॅश निर्मीती करीत आहोत.
डॉ.यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक.