धरण पाणीसाठामहाराष्ट्रसोलापूर जिल्हा

उजनी उजव्या कालव्यास पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडणार.

टिम: विजयदिप न्यूज.

उजनी धरणाच्या उजव्या कालाव्यामधून १ जुलै पासून पालखी सोहळ्यानिमित्त पाणी सोडले जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली.

मागील दोन वर्षे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. परंतु यावर्षी कोरोना संसर्ग कमी झालेला असून पालखी सोहळा सुरू झालेला आहे. यावर्षीच्या पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या स्नानासाठी तसेच इतर वापरासाठी पाण्याची कमतरता भासू नये व वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून उजनी उजव्या कालव्यास पाणी सोडण्यात येणार आहे.

यावर्षी लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरच्या योग्य नियोजनामुळे उजनी धरणाच्या पाण्यावरती अवलंबून असलेल्या उजनी उजवा व डावा कालवा तसेच भीमा नदी भागात पाण्याची कमतरता भासलेली नसल्यामुळे यावर्षीच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात कोठेही शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी ओरढ झालेली पहावयास मिळालेली नाही.

दरम्यान पावसाने ओढ दिल्यामुळे कालवा लाभक्षेत्रात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. परंतु पालखी सोहळ्यानिमित्त कालव्यास पाणी सुटणार असल्यामुळे वारकर्‍यां बरोबरच या भागातील शेतीच्या सिंचनासाठी सुध्दा फायदा होणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी म्हणून उजनी उजव्या कालव्यास १ जुलै पासून पाणी सोडले जाणार असून ते साधारणपणे १० ते ११ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये धरनामधून मुख्य कालव्यात ८०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाणार असून उजव्या कालव्याच्या मुखापर्यंत ते ६०० क्युसेक्स एवढे असेल तर टेलला ४०० क्युसेक्स असेल.

धिरज साळे.

अधिक्षक अभियंता,

लाभक्षेत्र प्राधिकरण, सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!