इतर

‘पांडुरंग सहकारी’ कडे गाळपासाठी १६ लाख मे. टन उसाच्या नोंदी– आ.प्रशांतराव परिचारक.

‘पांडुरंग सहकारी’चा बॉयलर अग्नी-प्रदिपन सभारंभ कार्यक्रम संपन्न.

उर्वरीत एफआरपी  दोन दिवसात सभासदांच्या खात्यावर जमा होणार!

टीम विजयदिप न्यूज.

पांडुरंग कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी १६ लाख मेट्रिक टन उसाच्या नोंदी आलेले आहेत, यावर्षी पांडुरंग सहकारी विक्रमी गाळप करेल तसेच आपला कारखाना हा आपल्या सभासद, कामगार व  ऊस तोडणी ठेकेदारांकरीता चालवतो. आपली स्पर्धा कोणाशी नाही, कारखान्याचा जो नावलौकिक मागील दहा-पंधरा वर्षापासून आहे. त्याच पद्धतीने पुढेही राहील.  दुसर्‍याशी स्पर्धा करण्यापेक्षा आपले घर, आपला प्रपंच हा नीट करणे ही कै.सुधाकरपंत परिचारक यांनी दिलेली शिकवण असून मागील पंचवीस ते तीस वर्षात आपण जी शिस्त घालून घेतली आहे. त्यामुळेच आपला कारखाना जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त आहे. असे प्रतिपादन आ.प्रशांत परिचारक यांनी केले. ते श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी-प्रदिपन सभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे,  दाजी पाटील, दिनकर नाईकनवरे, सभापती व्हरगर, राजाबापू गावडे, आप्पासाहेब जाधव, पोपटराव रेडे, बाळासाहेब माळी, भगवानराव चौगुले, बँक ऑफ बडोदा चे जनार्धन, दिलीपराव चव्हाण, कैलास खुळे, प्रणव परिचारक यांच्यासह कारखान्याचे आजी माजी संचालक, सभासद व कामगार उपस्थित होते.

प्रारंभी कारखान्याचे संचालक आनंद आरकिले व लक्ष्मीताई आरकिले यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. यानंतर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक, कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, दिनकरभाऊ मोरे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते अग्नि-प्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वागत व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख यांनी केले तर प्रस्ताविक  कार्यकारी संचालक  डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.

येत्या दोन दिवसात एफआरपीची सर्व रक्कम अदा.

पांडुरंग सहकारी कारखान्याची मागील गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये एफआरपी २ हजार ४३१ रुपये होती. त्यापैकी आतापर्यत शेतक-यांना प्रती मे.टन रू.२ हजार ३३१ प्रमाणे एफआरपी रक्कम अदा करण्यात आली असून येत्या दोन दिवसात केंद्र शासनाच्या धोरणानुसार उर्वरीत एफआरपीची रक्कमही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्याच्या उस उत्पादक शेतकर्‍यांना २०२०-२१ मध्ये गाळप झालेल्या ऊसाची संपूर्ण एफआरपी रक्कम अदा होत आहे.

पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, केंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून २०२५ पर्यंत पेट्रोल मध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पांडुरंग कारखाना सुरू झाल्यापासून पहिल्या आठ दिवसातच ऊसाचा रस इथेनॉल निर्मिती कडे वळणार आहे. भविष्यकाळात कारखान्याला जास्त पैसे मिळतील. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच पांडुरंग सहकारीने उसाचा रस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याचा उपक्रम राबविला असून कारखान्यास गाळपासाठी येणाऱ्या ऊसा पैकी जवळपास प्रतिदिन १ हजार ५०० मे.टन ऊसाचा रस इथेनॉलकडे वळणार आहे. इथेनॉल निर्मितीमुळे लवकरात-लवकर शेतकर्‍यांना एफआरपी देणे शक्य होईल. असेही ते म्हणाले.

दिवसाला ९ हजार टन ऊस पुरवठा करू शकेल एवढी यंत्रणा.

गळीत हंगाम २०२१-२२ साठी जवळ-जवळ १५ लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान कारखान्या पुढे आहे. या वर्षीच्या हंगामात कारखान्याकडे ५०० ट्रॅक्टर, २५० बजाट तसेच बैलगाड्या असून दिवसाला ९ हजार टन ऊस कारखान्याला पुरवठा करू शकेल एवढी यंत्रणा कारखान्याने उभी केली आहे.

मागील हंगामात कै.सुधाकरपंत परिचारक यांनी १० लाख टन उसाच्या गाळपाचे स्वप्न पाहिले होते ते आपण पूर्ण केले. तसेच जिल्ह्यात चांगली एफआरपी व रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी पूर्ण केला. या वर्षी उसाचे उत्पादन विक्रमी आहे आपल्याला जास्तीत-जास्त गाळप करावयाचे आहे. येणारा गळीत हंगाम हा कारखान्याच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडणारा व रेकॉर्ड ब्रेक गाळप हंगाम असणार आहे. इथेनॉल निर्मिती व ब्राझील मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे मुळे जगात साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. त्याचा निश्चितच फायदा साखरेचे दर आपल्याला मिळण्यास होणार आहे. तसेच येणार्‍या हंगामात चांगली रिकव्हरी व चांगला दर देण्याचा प्रयत्न असेल.

डॉ.यशवंत कुलकर्णी,

कार्यकारी संचालक, पांडुरंग सहकारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!