सोलापूर जिल्हा

नाथसिंह देशमुख यांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती.

टीम विजयदिप न्यूज.

माळेवाडी (बोरगाव) ता.माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असलेले नाथसिंह बाबासाहेब देशमुख यांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली असून त्यांना सध्याच्या ठिकाणाहून कार्यमुक्त होऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेवरे येथे पदोन्नतीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश शिक्षणाधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांचेकडून देण्यात आले आहेत.

नाथसिंह देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या घोडकी येथील मूळचे रहिवासी असून शेतकरी कुटुंबातील आहेत. गावाकडील दुर्गम भाग असल्याने व शिक्षणाच्या पुरेशा सुविधा नसल्याने त्यांनी लहानपणीच शिक्षणासाठी गाव सोडून बार्शी तालुक्यात येऊन आपले शिक्षण पुर्ण केले. सन १९९० मध्ये नाथसिंह देशमुख यांनी माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केली. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे, शिस्त व वक्तशीर शिक्षक अशी त्यांची ओळख निर्माण केली. दसूर, भगतवस्ती (महाळूंग), माळेवाडी (बोरगाव) या ठिकाणच्या शाळेत कार्य करीत असताना भगतवस्ती जिल्हा परिषद शाळेस आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

नाथसिंह देशमुख यांच्यासह तालुक्यातील प्रथमच मोठ्या संख्येने पदोन्नती मिळालेल्या ३२ मुख्याध्यापकांचा सन्मान शिक्षण विभाग, पंचायत समिती माळशिरस यांचे वतीने करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपसभापती प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी महालिंग नकाते उपस्थित होते. तसेच माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरूसेवा शिक्षक परिवार यांनी नुतन मुख्याद्यापकांचे पदोन्नती बद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!