उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग घटला; उजनी धरण @ ७७.१८ टक्के.

उजनी धरण भरण्यास विलंब लागणार.
टीम विजयदिप न्यूज.
सोलापूर जिल्हयासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा बुधवारी सायं.६ वाजेपर्यंत ७७.१८ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, येत्या आठवडाभरात धरण शंभर टक्के भरण्याची अपेक्षा असतानाच पुणे जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. मागील १२ तासात उजनीच्या वरील सर्व २० धरणावरती फक्त ३ मी.मी पावसाची नोंद झालेली असून अनेक धरनामधून सोडला जात असलेला विसर्ग बंद करण्यात आलेला आहे परिणामी पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आणखी कांही दिवस उजनी धरण भरण्याची वाट पहावी लागणार आहे.
आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणात पाण्याची पातळी ४९५.७५० मी. एकूण पाणीसाठा २९७३.७८ द.ल.घ.मी म्हणजेच १०५.०१ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा ११७०.९७ द.ल.घ.मी म्हणजेच ४१.३५ टीएमसी एवढा असून धरणाची टक्केवारी ७७.१८ टक्के एवढी आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला असून दौंड येथून येणारा विसर्ग १५५९७ क्युसेक तर पुण्याच्या बंडगार्डन येथून येणा-या पाण्याचा विसर्ग १०३९१ क्युसेक इतका झाला आहे.
भीमा खोर्यातील धरणांची स्थिती, सोडण्यात आलेला व पर्जन्यमान विसर्ग तक्ता.
