निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

टिम विजयदिप न्यूज.
नीरा खोर्यात अतिवृष्टी, वीर मधून उद्या दुपारनंतर नीरा नदीत पाणी सोडण्याची शक्यता.
निरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणी पातळी ६५९.४० मीटर, एकूण साठा ८ हजार २८० द.ल.घ.फू तर धरणाची टक्केवारी ६९ टक्के इतकी झाली आहे. परिणामी निरा-देवघर धरनामधून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते हे सर्व पाणी वीर धरणात येणार आहे. यामुळे उद्या शुक्रवार दुपारनंतर वीर धरणातील पाणीसाठा व पडणारा पाऊस बघून कोणत्याही क्षणी वीर धरनामधून निरा नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते.
निरा-देवघर धरणातून पाणी वीर धरणात येते वीर धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीर धरणातून पाणी निरा नदीच्या पात्रात सोडले जाईल त्यामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस, बारामती, पंढरपूर, तालुक्यातील निरा तसेच माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.
मागील १२ तासात निरा-देवघर धरणात २ हजार ४२२ द.ल.घ.फु इतक्या पाण्याची आवक झालेली आहे. म्हणजेच निरा-देवघर धरणात सरासरी ५६ हजार ०४५ क्युसेक्स विसर्ग येत आहे.