धरण पाणीसाठा

बळीराजासाठी आनंदवार्ता; धक्के घेत-घेत अखेर उजनी ‘शंभरी’च्या घरात.

टीम विजयदिप न्यूज.

सोलापूर तसेच पुणे व नगर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाणे अखेर धक्के घेत-घेत आज सकाळी शंभरीच्या घरात प्रवेश केला असून आज मंगळवार दि.०५ ऑक्टोबर रोजी स.६ वा. उजनी धरणाची टक्केवारी ९८.९० टक्क्यावरती पोहचली आहे. तसेच धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण सायंकाळ पर्यंत १०० टक्के होईल.

दरम्यान मान्सून सुरू झाल्यानंतर जोरदार पावसाची अपेक्षा होती, मात्र मान्सूनमध्ये अडखळत पणा निर्माण झाल्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळीमध्ये संथगतीने वाढ होत होती. सद्या परतीचा पाऊस सुरू असून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे संथगतीने का होईना उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सद्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण आज सकाळी ९८.९० टक्के भरले आहे. आज सायंकाळ पर्यंत उजनी धरण १०० टक्के भरणार आहे. परतीच्या पावसाचा जोर पाहता शेतकऱ्यांचे लक्ष उजनी धरण पूर्ण क्षमतेने १११ टक्के भरण्याकडे लागले आहे.

दरम्यान आज सकाळी उजनी धरणाच्या वरील धरण साखळीमधील शेवटचे धरण असणार्‍या घोड धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून धरणाच्या सांडव्यामधून सकाळी ६.१५ वाजल्यापासून ३ हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत असल्यामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

आज मंगळवार दि.०५ ऑक्टोबर रोजी स.६ वा. उजनी अपडेट.
पाणी पातळी४९६.७८० मी.
एकूण साठा ३३०३.२४ (११६.६४ टीएमसी)
उपयुक्त साठा१५००.४३ (५२.९८ टीएमसी)
टक्केवारी९८.९०%
बंडगार्डन४३५९ क्युसेक्स.
दौंड विसर्ग४१६४ क्युसेक्स.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!