सोलापूर जिल्हा

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच सायकलींची ही गरज.- यशवंत कुलकर्णी

टीम विजयदिप न्यूज.

सध्याच्या काळात माणसाला वयाच्या पन्नाशीनंतर वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो, हे आजारच होऊ नये यासाठी लहानपणा पासूनच शरीराला व्यायामाची आणि त्याच बरोबर सायकलींची ही सवय असल्यास माणसाचे व्यायामातून कोणताही आजार न होता शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मोठी मदत होते असे प्रतिपादन श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.

श्रीपुर येथे शिवरत्न फाउंडेशन, डॉटर्स मॉम फाउंडेशन, रोटरी क्लब अकलूज व सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १० किलोमीटर सायकलींचे केलेले आव्हान व पंढरपूर सायकल क्लब ने आयोजित केलेल्या मुलींसाठी चे २० किलोमीटर चे आव्हान पार केलेल्या कामगारांच्या मुला- मुलींचे सन्मान श्रीपुर येथे कारखानास्थळावर करण्यात आला.त्यानिमित्त श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कामगार कल्याण मंडळाच्या मार्फत यशस्वी सायकलींग पार केलेल्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यकारी संचालक डाॅ. यशवंत कुलकर्णी बोलत होते.

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुधीर पोफळे यांनी केले. यानंतर अकलूज व पंढरपूर येथे सायकल मध्ये २० व ३० किलोमीटरचे अंतर पार केलेल्या यशस्वी विद्यार्थिनी कु.राजनंदिनी भोसले, धनश्री जाधव, प्रियांका पवार, अक्षरा हसुरे, प्रणाली खुळे, हर्षदा  शिंदे, श्रीहर्षा बेंद्रे, प्रियदर्शनी  घाडगे, साईश विभुते आदीं कामगारांच्या मुलांचा कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते मेडल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रॉडक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पोफळे, हेड टाईम कीपर सोपान कदम, चीप अकाउंटंट रवींद्र काकडे, कॉम्प्युटर मॅनेजर तानाजी भोसले, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर ,महेश देशपांडे, भुषण धाईंजे आदी. उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!