महाराष्ट्र

‘पांडूरंग सहकारी’चे पहिल्यांदाच विक्रमी १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण.

शेतकर्‍यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच गाळप उद्दिष्ट पूर्ण.- आ.प्रशांत परिचारक.

टीम विजयदिप न्यूज.

श्रध्देय कै.सुधाकरपंत परिचारक यांनी गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये १० लाख मे.टनाचे गाळप होईल असे कारखान्याच्या रोलर पूजनावेळी जाहीर केले होते. त्यानुसार कारखान्याचे कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी, युनियन पदाधिकारी, सर्व कर्मचारी यांनी विना थांबा यापूर्वीचे दैनंदिन गाळपाचे रेकॉर्ड मोडून ६ हजार ७०० मे.टन सरासरी दैनिक गाळप करुन इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी १० लाख ६ हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. असे मत श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले ते कारखान्याच्या गळीत हंगाम २०२०-२१ सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भाव संदर्भातील सर्व नियम व अटी पाळून हा सांगता समारंभ संपन्न झाला.

यावेळी प्रास्ताविक करताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले की, श्रध्देय कै.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या धोरणानुसार कारखान्याचा गाळप हंगाम संपन्न करीत असताना त्यांनी दिलेले गाळपाचे उद्दिष्ट चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले असे डॉ.कुलकर्णी म्हणाले.

पांडुरंग सहकारी कारखान्याच्या यंदाच्या हंगामाची वैशिष्टे

एकूण गाळप१० लाख ६ हजार मे.टन
साखर उतारा  ११.४१ टक्के
साखरेचे उत्पादन११ लाख १३ हजार क्विंटल.
को-जनरेशन प्रकल्प६.६७ कोटी युनिट वीज निर्मिती करुन ३.६२ कोटी  युनिट विक्री केली.
डिस्टीलरी प्रकल्प८१.५७ लाख लिटर इतके उत्पादन केले.
को-जनरेशन व डिस्टीलरी प्रकल्प साधारणपणे दोन महिने पुढे चालणार आहेत.

पुढे बोलताना चेअरमन आ.प्रशांत परिचारक म्हणाले की सोलापूर जिल्हातील सर्वच कारखाने सुमारे एक महिन्यापूर्वीच बंद झाले असून पांडुरंग परिवारातील शेतकर्‍यांनी उशिरापर्यंत थांबून कारखान्यावरती विश्वास दाखवून ऊस कारखान्यास घातला. शेतकर्‍यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच गाळप उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. कारखाना हा शेतकरी कामगार यांच्या हितासाठी तत्पर असणार आहे. पाठीमागील काही वर्षापासून सातत्यपूर्ण वाढणारे साखरेचे उत्पादन व बाजारपेठेमध्ये असणारी साखरेची कमी मागणी यामुळे सद्य परिस्थितीत साखर व्यवसाय अडचणीत आहे. यावर मात करण्यासाठी आसवनी प्रकल्पामधून इथेनॉल उत्पादन करुन विक्री करणे आवश्यक आहे. त्यानुसार कारखान्याने याहीवर्षी सुमारे ४१ लाख लिटर इतक्या इथेनॉलचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यापैकी आज सुमारे २५ लाख लिटर इथेनॉल विक्री केले आहे.  पांडुरंग परिवारातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे एक महिना उशिरा पर्यंत त्यांचा ऊस राखून ठेवला त्याबद्दल आ.प्रशांतराव परिचारक यांनी त्यांचे मनस्वी आभार मानले. त्याच बरोबर तोडणी वाहतुकदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन  वसंतनाना देशमुख यांनी कै. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर कारखाना चालत असून या हंगामात त्यांनी दिलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे, तसेच त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, हरिषदादा गायकवाड, शिवाजीराव साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, सुरेश आगावणे, बाळासो यलमार, तानाजी वाघमोडे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, दिनकरराव कवडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, नागन्नाथ शिंदे, सांगिता पोरे, पार्वती नरसाळे, सिंधू पवार, भिमराव फाटे, अरुण घोलप आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!