कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळापूर पोलिसांकडून ८५ हजार ९०० दंड वसूल.

पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.
टीम विजयदिप न्यूज.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी नियम मोडणाऱ्यांवर वेळापूर पोलिसांनी कडक कारवाई केली असून फेब्रुवारी ते १६ मार्च पर्यंत या दोन महिन्यांमध्ये वेळापूर पोलिसांनी एकूण ८५ हजार ९०० रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी दिली आहे.

मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स चे पालन न करीत गर्दी करणे आदींवर यामध्ये कडक कारवाई करण्यात आली असून कोरोना बाबत हलगर्जीपणा दाखविणाऱ्या विरुद्ध ही कारवाई झाली आहे.
यामध्ये फेब्रुवारी मध्ये मास्क न वापरणे ३९ केसेस १९ हजार ५०० रुपये दंड, सोशल डिस्टन्स १४१ केसेस १४ हजार १०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ८ केसेस १ हजार ६०० रुपये दंड, तर १ मार्च ते १६ मार्च दरम्यान मास्क न वापरणे ७० केसेस ३५ हजार रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २० केसेस ४ हजार रुपये दंड, सोशल डिस्टन्स ११७ केसेस ११ हजार ७०० रुपये दंड अशी कारवाई करण्यात आली आहे.
तर फेब्रुवारी मध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई करत ३४७ केसेस द्वारे ८५ हजार ८०० रुपये एवढा दंड व मार्च महिन्यात १६ मार्च पर्यंत ५८ केसेस द्वारे १२ हजार ३०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ एस. टी तांबोळी, ए. एन बंदुके, एन. व्ही थिटे यांच्या पथकाने केली आहे.