उजनीमधून उन्हाळी हंगामाचे आवर्तन आजपासून – धिरज साळे.

धरनामधून उन्हाळी हंगामात दोन आवर्तने सोडण्याचे झाले नियोजन.
टीम विजयदिप न्यूज.
उजनी धरनामधून कालवा, भीमा नदी तसेच भीमा सीना जोड कालव्यास शनिवारी दि.२० मार्च पासून पाणी सोडण्यात येणार असून उन्हाळी हंगामात दोन आवर्तने सोडण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता डी.बी साळे यांनी दिली.
उन्हाळी हंगामात सिंचनासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार असून या दोन आवर्तनात कालवा, भीमा नदी, भीमा सीना जोड कालवा (बोगदा), सीना माढा उपसा सिंचन योजना, दहिगांव उपसा सिंचन योजना यासाठी धरणातील ३५ टीएमसी नियोजित पाणी वापर आहे. तर जलाशय बाष्पीभवन, जलाशय सिंचन व जलाशय बाष्पीभवन यावरती जवळपास १२.२५ टीएमसी पाणी जाणार आहे. असे एकूण ४७.२५ टीएमसी पाणी धरणातून कमी होणार आहे.
उजनी धरणात शुक्रवार दि.१९ मार्च २०२१ रोजी एकूण पाणीसाठा ९६.९६ टीएमसी एवढा होता. तर उपयुक्त पाणीसाठा ३३.३० टीएमसी एवढा असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ६२.१६ टक्के एवढी आहे. ही दोन आवर्तने सोडल्यानंतर उजनी धरण दि.३० जून २०२१ रोजी संभाव्य उपयुक्त पाणीसाठा उणे १३.०६ टीएमसी तर टक्केवारी उणे २४.३७ टक्के वरती जाण्याची शक्यता आहे.
