सहकार शिरोमणीचे बॉयलर अग्निप्रदिपन गव्हान व मोळी पुजन उत्साहात संपन्न.

ऊस उत्पादकांची पै न पै देण्यास बांधील- कल्याणराव काळे.
विजयदिप न्यूज.
कारखान्यास कर्ज उपलब्ध करुन घेण्यासाठी बँकांकडून विलंब झाला त्यामुळे ऊस उत्पादकांना वेळेत बिले अदा करता आली नाहीत. मात्र ऊस उत्पादकांची पै न पै देण्यासाठी आपण बांधील असून, ही बांधीलीकी कायम जपणार आहोत असे प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी केले.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ च्या २१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विष्णु पोरे, रघुनाथ झांबरे, दामोदर दुपडे, संभाजी नाईकनवरे या जेष्ठ कर्मचारी यांच्या शुभहस्ते आणि गव्हाण मोळी पुजन समारंभ कारखान्याचे जेष्ठ सभासद भगवान बुरांडे, ज्ञानेश्वर शेंबडे, नवनाथ माने, नारायण गायकवाड, महादेव कानगुडे, संजय गाजरे, रमेश नागणे यांच्या हस्ते संपन्न झाला. तत्पुर्वी शेती विभागातील अॅग्री ओव्हरसिअर प्रकाश कृष्णा शिंगटे व त्यांच्या सुविद्य पत्नी नागरताई शिंगटे या उभयतांच्या शुभहस्त्े होमहवन आणि जेष्ठ सभासद संजय गाजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी निलावती गाजरे या उभयतांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आले त्यानंतर झालेल्या सभेत काळे बोलत होते. ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्वर लामकाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पुढे बोलताना कल्याणराव काळे म्हणाले अनेक अडचणी व संकटावर मात करुन आज आपण कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण मोळी पुजनाचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत. या हंगामासाठी कारखान्याकडे झालेल्या ऊस नोंदीचा विचार करता. सहा लाख मे.टन ऊस गाळपाचे तसेच ७५ लाख लिटर डिस्टीलरी उत्पादन आणि ४ कोटी युनिट वीज निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही सर्व उद्दीष्टे साध्य करण्यासाठी ट्रक, ट्रॅक्ट्रर, बौलगाडी, डंपींग व हार्वेस्टर ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करुन अॅडव्हान्स वाटप केलेला आहे. तसेच कारखाना को-जन, डिस्टीलरीचे सर्व मशिनरीचे दुरुस्तीचे कामे पुर्ण झाली आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे मागील गळीत हंगाम २०१९-२० बंद ठेवावा लागल्यामुळे आर्थिक गणित कोलमडून बँकेकडून निधी उपलब्ध करण्यास अडचणी आल्या. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले. गळीत हंगाम चालु करण्यासाठी जवळपास सर्वच कारखान्याना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सन २०२० हे वर्ष कोरोना, दुष्काळ परिस्थिती, शिल्लक साखर साठा, त्यामुळे होणारा आधिक व्याजाचा भुर्दंड यामुळे अनेक समस्यांना सर्वांना सामोरे जावे लागले आहे. तथापी खासदार शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे शासनाची हमी मिळुन राज्य बँकेकडून कर्ज उपलब्ध झालेमुळे आपले कारखान्याचा गळीत हंगाम चालु करता आला असल्याचे सांगीतले. कारखान्यास निधी उपलब्ध करण्यासाठी विलंब झालेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल अदा करण्यास विलंब झाला. यापुढे ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवु देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. चालु गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, मजुर कारखान्याचे आधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जेष्ठ सभासद संजय गाजरे, तोडणी वाहतुक ठेकेदार परमेश्वर लामकाने, जेष्ठ कर्मचारी प्रकाश शिंगटे यांनी मनोगत व्यक्त करुन गळीत हंगाम शुभारंभास शुभेच्छा दिल्या.
दिवाळीसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप
कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकरी यांना दिवाळी सणासाठी सवलतीच्या दरामध्ये प्रत्येकी ५० किलो साखर ०२ नोव्हेंबर पासुन पंढरपूर, कारखाना कार्यस्थळ व भोसेपाटी या तीन ठिकाणी साखर विक्री केंद्रातून करण्यात येणार आहे. साखरेचे कुपन चिटबॉय घरपोच करणार आहेत. संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी स्वत:चे आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवुन साखर घेण्यात यावी.
यावेळी यशवंत पतसंस्थेचे चेअरमन नारायणदादा मोरे, व्हा.चेअरमन शहाजी साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमर, माजी चेअरमन महादेव देठे, श्री.विट्ठल कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे, निशिगंधा बँकेचे व्हा.चेअरमन आर.बी.जाधव, व्यवस्थापक कैलास शिर्के, जनकल्याण हॉस्पिटलचे डॉ.सुधीर शिनगारे, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे, सुरेश देठे जयसिंह देशमुख, मोहन उपासे, श्रीमंत लिंगडे, हणमंत मोरे, दिलीप भानवसे, अनिल नागटिळक, नारायण शिंदे, सुनिल पाटील, डॉ.महारनवर, महादेव सुरवसे, दाऊद शेख, रामचंद्र कौलगे, विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक गोरख जाधव, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, राजाराम पाटील, युवराज दगडे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, नागेश फाटे, माजी संचालक शहाजी पासले, भारत गाजरे, राजसिंह माने, पांडूरंग कौलगे, इस्माईल मुलाणी, हणमंत सुरवसे, प्रताप म्हेत्रे, दिपक गवळी, सुभाष यादव, एम.एस.सी बँकेचे अधिकारी एस.जी.गावंडे कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.वाय.महिंद, सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख व कर्मचारी वर्ग, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, हंगामी कंत्राटदार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी, कार्यकर्ते हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समाधान काळेसर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक दिनकर चव्हाण यांनी मानले.