महाराष्ट्र

पोलीस निरीक्षकासह दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला.

टीम विजयदिप न्यूज.

वेळापूर (ता.माळशिरस) येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके यांच्यासह पोलीस नाईक दीपक मेहरकर इतर पोलीस कर्मचारी यांच्यावर वेळापूर येथील एका वस्तीवरील ५०-६० लोकांनी मिळून प्राणघातक हल्ला केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर असलेल्या एकावस्तीवरती अवैध दारू विक्री व्यवसाय सुरू आहे याचे खबर मिळताच पोलीस निरीक्षक भगवान खरतोडे यांच्यासह इतर पोलिसांनी सदरील ठिकाणी धाव घेतली येथील वस्तीतील घरांमध्ये जाऊन दारू नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अवैद्य धंदा करणारे वस्तीमधील ५० ते ६० पुरुष व महिलांनी मिळून वेळापूर पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस अधिकारी गंभीर जखमी तर एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे.

वेळापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी यापूर्वी वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बऱ्याचश्या अवैद्य धंद्यावर आळा बसवला होता, तसेच अवैद्य दारू विक्री करणारे लोक यांच्यावर कडक कारवाई केली आहे, कोरोना काळात मोकाट फिरणाऱ्या लोकांचीही कोरोना चाचणी करून नियंत्रण मिळविले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अकलुज उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. सदर प्रकरणाबाबत गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!