‘पांडुरंग सहकारी’ची गाळप क्षमता होणार १० हजार मॅट्रिक टन- प्रशांतराव परिचारक

‘पांडुरंग सहकारी’चा ३२ वा बॉयलर अग्नि प्रदीपण समारंभ उत्साहात.
टिम: विजयदिप न्यूज
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा कै.सुधाकरपंत परिचारक यांनी घालुन दिलेल्या तत्वांचे कोटेकोरपणे पालन करुन त्यांच्याच मार्गाने मार्गक्रमण करीत आहे. गत हंगामात कारखान्याने गाळपात उच्चांक निर्माण केले. तसेच पुढील गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याचे विस्तारीकरण करणार असून प्रति दिन १० हजार मे.टन क्षमतेने गाळप केले जाईल असे मत कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केले ते श्रीपूर(ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांच्या ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम २०२२-२३ साठी ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ कारखान्याचे संस्थापक माजी चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकाऱ्यांच्या तसेच पंढरपूर मार्केट कमिटीचे सभापती दिलीप घाडगे, दिनकरराव मोरे यांचे शुभहस्ते आणि कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे व त्यांच्या सुविद्य पत्नि ज्योती खुळे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
पुढे बोलताना चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक म्हणाले की, कै.सुधाकरपंत परिचारक यांनी घालुन दिलेल्या तत्वांचे कोटेकोरपणे पालन करुन त्यांच्याच मार्गाने कारखाना मार्गक्रमण करीत असून गत हंगामात कारखान्याने गाळपात उच्चांक निर्माण केले. या हंगामासाठीही कारखान्याकडे सुमारे १४ लाख मे.टन ऊसाच्या नोंदी आहेत. या सर्व ऊसाचे गाळप कारखाना वेळेवर करणार आहे. गत हंगामाप्रमाणेच या हंगामातही उच्चांकी गाळप, उच्चांकी साखर उतारा, उच्चांकी ऊस दर असे धोरण अवलंबणार असल्याचे सांगितले. पुढील गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्याचे विस्तारीकरण करणार असून प्रति दिन १० हजार मे.टन क्षमतेने उसाचे गाळप केले जाईल.
कै.सुधाकरपंत परिचारक यांचे पंढरपूर तालुक्यातील ज्येष्ठ सहकारी यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपण करुन त्यांच्या मनातील मोठ्या मालकांविषयी असलेल्या भावनांची कदर केली आहे. पंढरपूर गटातून सिताराम खरात रा.खर्डी, देगाव गटातून शंकर घाडगे रा.अजनसोंड, जनार्धन खरात रा.खरातवाडी, चळे गटातून ज्योती मोरे रा.मुंढेवाडी, दगडू लेंगरे रा.गोपाळपूर, आनंदराव क्षिरसागर रा.चिचूंबे, सिताराम नागणे रा.ओझेवाडी, भाळवणी गटातून येदु गाढवे रा.कौठाळी, दशरथ धुमाळ रा.कौठाळी, रामचंद्र केसकर रा.केसकरवाडी, नामदेव झांबरे रा.पळशी, भोसे गटातून मुरलीधर पाटील रा.आव्हे, तुकाराम नायकुडे रा.पेहे, दत्तू सातूरे रा.नांदोरे, करकंब गटातून पांडुरंग शिंदे रा.उंबरे पा, लक्ष्मण बेलदर रा.करोळे, शिवदास नरसाळे रा.जळोली, वारकरी सांप्रदयाचे सुदाम गरदडे रा.श्रीपती पिंपरी यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी कै.सुधाकरपंत परिचारक यांच्याबरोबर कारखान्याचे कामकाज करताना आलेल्या अनुभवाचे कथन केले. शेवटच्या क्षणी कै.सुधाकरपंत परिचारक रुग्णालयात असतानाही शेतकऱ्यांसाठी बैल पोळा सणाचे महत्व सांगून त्यांनी ऊस बिलाचा हप्ता काढणेचे आदेश दिले होते. ज्याप्रमाणे कै.सुधाकरपंत परिचारक काम करताना ध्येय धोरणे निश्चित करत होते. त्याचप्रमाणे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक ही तशीच ध्येय धोरणे राबवित असून कारखान्याची प्रगती साधत आहेत.
यावेळी ॲड.प्रकाश पाटील, पंढरपूर मार्केट कमिटीचे सभापती दिलीपराव घाडगे यांनी कै.सुधाकरपंत परिचारक याचे सोबत काम करताना आलेल्या अनुभवांना आणि आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास महाळूंगचे नगराध्यक्ष पती अशोकराव चव्हाण, उपनगराध्यक्ष भीमराव रेडे-पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार(नाना) पाटील, रामचंद्र सावंत-पाटील, नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, मौला पठाण, मोहासिन पठाण, विक्रम लाटे, नगरसेवक सोमनाथ मुंडफने, तानाजी भगत, नामदेव पाटील, विवेक कचरे, अर्बन बँकेचे संचालक हरिष ताटे, मुन्नागिर गोसावी, बाळासाहेब देशमुख पंचायत समिती सदस्य, तसेच महाळूंग श्रीपूर नगरपंचायतीचे नगरसेवक, बँकेचे अधिकारी, कारखान्याचे संचालक दिनकरराव मोर, वसंतराव देशमुख, दिलीपराव चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजीराव वाघमोडे, बाळासो यलमार, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरु वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, मधुकर पाटील, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्यासह शेतकरी कारखान्याचे अधिकारी, कामगार उपस्थित होते.
कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, हनुमंत नागणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर दिलीपराव चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.