इतर

‘पांडुरंग सहकारी’ने ऊस तोडणी मजुरांकडून शेतकर्‍यांची होणारी आर्थिक पिळवणूक कमी करण्यासाठी घेतला महत्वपूर्ण निर्णय.

ऊस तोडणीस प्रति मे.टन ५० रुपये आगाऊ रक्कम जाहीर.

टिम: विजयदिप न्यूज.

ऊस उत्पादक शेतकरी यांची तोडणी मजुरांकडून होणारी आर्थिक पिळवणूक व ऊस जळीताचे सत्र कमी करण्यासाठी श्रीपूर(ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने तोडणी मजूरांना प्रति मे.टन ५० रुपये एवढी आगाऊ रक्कम जाहीर करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतला व शेतकऱ्यांचे हित जोपासन्याचे काम केले आहे या निर्णयामुळे ‘पांडुरंग सहकारी’च्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘पांडुरंग सहकारी’ कारखान्याचा चालू २०२१-२२ हा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, यापुढे साधारणपणे एक महिना गळीत हंगाम सुरु राहणार आहे. असे असताना ऊस तोडणी करणाऱ्या तोडणी मजूर यांचेकडून ऊस उत्पादकांची आर्थिक अडवणुक होत असलेचे व विनाकरण ऊस जळीत करुन आणणेचे प्रमाण वाढु लागल्यामुळे कारखाना व्यवस्थापनाने १ एप्रिल २०२२ पासून ऊस तोडणी करणाऱ्या तोडणी मजूरांना प्रति मे.टन ५० रुपये इतकी आगाऊ तोडणी रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडुन ऊस तोडणीकरीता आगाऊ रक्कम घेवू नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऊस जळीत करुन तोडु नये या निकषांचे तोडणी ठेकेदाराकडुन तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यातील वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस तोडणी मजुरांची कार्यक्षमता कमी झालेमुळे ऊस तोडणी कमी होत आहे. याचा विचार करुन कारखाना व्यवस्थापनाने २५ मार्च २०२२ पासून जे ऊस उत्पादक शेतकरी स्वत: मालकतोड करुन ऊस पुरवठा करतील अशा शेतकऱ्यांना कमिशनसह रु.४०० प्रति मे.टन प्रमाणे ऊस तोडणी दर देणेचे धोरण जाहीर केलेले आहे. तरी जास्तीत-जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस स्वत: मालकतोड करुन कारखान्यास पाठवावा असे आव्हान कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांतराव परिचारक यांनी केलेले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी तसेच सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी “शेतकरी हिताय कामगार सुखाय” या व्दिसुत्रीचा कायमच अवलंब केलेला असून शेतकऱ्यांना नेहमीच विविध प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका ठेवली होती. त्याचप्रमाणे आ.प्रशांतराव परिचारक यांनी देखील ऊस उत्पादकांची ऊस तोडणी करीता असणारी तळमळ लक्षात घेवून आगाऊ प्रति मे. टन ५० रुपये इतकी रक्कम तोडणीकरीता जाहीर केलेली असून यामध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासन्याचे काम होणार आहे असे प्रतिपादन कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणु पाटील, आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!