‘पांडुरंग सहकारीची’ विश्वासार्हता सिद्ध; वजनकाटा तंतोतंत; वैधमापन तपासणी पथकाचा अहवाल.

टीम विजयदिप न्यूज.
श्रीपूर(ता.माळशिरस) येथील श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा तंतोतंत असल्याचा वैधमापन तपासणी पथकाचा अहवाल असून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सुचनेनुसार वैधमापन विभाग पथकाने पांडुरंग सहकारीच्या सर्व काटयांची तपासणी केली व सर्व वजनाकाटे तंतोतंत व बरोबर असल्याचा अहवाल दिला.

श्री.पांडुरंग सहकारी कारखान्याच्या ८०, ६०, ५०, ५० टनी अशा एकूण चारही वजन काटयाची तपासणी केली तसेच वैधमापन विभागाने पूर्वी केलेले सील जसेच्या तसे शाबूत होते. सदर पथकाने पांडुरंग सहकारीचे सर्वच वजनकाटे तंतोतंत व बरोबर असून त्यामध्ये कोणताही फेरफार नसलेचा अहवाल दिला आहे.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू न देता विश्वासाहर्ता आजच्या वजनकाटा तपासणीने कायम ठेवली आहे.
यामध्ये वैधमापन पथकाने सुरुवातीस कारखान्याकडील असणाऱ्या चारही काटयाची तपासणी करत एकच वाहन चारही काटयावर फिरवून वजन केले असता त्यामध्ये कोणताही फरक आढळून आला नाही. त्यानंतर काटयावर २० किलोची प्रमाणित ५ टन वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता त्यामध्येही वजनात कोणताही फरक आढळून आला नाही.
पांडुरंग वर गेल्या २५ वर्षापासून ऊस उत्पादकांनी दाखविलेली विश्वासाहर्ता आजही काटा तपासणीने पुन्हा एकदा सिध्द केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतक-यांचे हित जोपासलेमुळे ऊस उत्पादक शेतकरी नेहमीच कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात तसेच पांडुरंग कारखान्याने सोलापूर जिल्हयामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून नाव लौकीक मिळविला आहे.
वैधमापन तपासणी पथकामध्ये पुरवठा निरीक्षक सी.बी.लोखंडे, वजनमापे निरीक्षक आर.बी.बंडापल्ले, लेखापरिक्षक पी.आर.शिंदे , पोलिस नाईक अकलूज पोलिस स्टेशन एस.एच. कोळी, इत्यादी अधिकाऱ्याबरोबर शेतकरी भिकू सदाशिव पाटील व मारुती संभाजी गाडवे त्याचबरोबर कारखान्याचे चीफ अकौंटंट आर.एम.काकडे, सिव्हील इंजीनिअर एच.एस. नागणे, कॉम्प्युटर इंचार्ज टी.एस.भोसले, केनयार्ड सुपरवायझर जी.एम.बागल इ. उपस्थित होते.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली चालत असून कारखान्याने आजपर्यंत नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले असून उच्चांकी साखर उतारा, उच्चांकी साखर उत्पादन, शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून अनेक विक्रम केले आहेत. मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे सूचनेनुसार आज वैधमापन विभगाकडून झालेल्या काटा तपासणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावरील वजन काटयाबाबत असणारा विश्वास आणखी दृढ झाला आहे.
डॉ. यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक