सोलापूर जिल्हा

उजनीतून भीमा नदीत व कालव्यास पाणी सोडणार.

कालव्यातून साधारणपणे ६ टीएमसी तर भीमा नदीला ५.५ टीएमसी पाणी सोडले जाणार.

विजयदीप न्यूज.

      उजनी धरणामधून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उदया मंगळवार दि.१९ जानेवारी पासून भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे. तर धरणामधून कालव्यास बुधवार दि.२० जानेवारी पासून सिंचनासाठी रब्बी हंगामातील आवर्तन सोडले जाणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर चे अधीक्षक अभियंता डी.बी साळे यांनी दिली.

            यावर्षी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व लाभक्षेत्रात देखील चांगले पर्जन्यमान झालेले आहे. यामुळे कालवा लाभक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत तरी भूगर्भातील पाणीसाठा टिकून राहिलेला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात सिंचांनाच्या पाण्याची टंचाई जाणवलेली नाही. असे असले तरी देखील लाभक्षेत्रातील कांही भागात पाण्याची कमतरता जाणवू लागलेली आहे.

      या पाण्यामुळे ऊस, ज्वारी, गहू, हरभरा तसेच उभ्या पिकांना याचा फायदा होणार आहे.

उजनी अपडेट दि.१८ जानेवारी २०२०

पाणी पातळी                ४९७.०२० मी.
एकूण पाणी साठा       ३३८४.२८ द.ल.घ.मी,
उपयुक्त पाणी साठा   १५८१.४७ द.ल.घ.मी,
एकूण टीएमसी     ११९.५० टीएमसी,
उपयुक्त टीएमसी   ५५.८४  टीएमसी,
टक्केवारी   १०४.२४%,

“उजनी धरणाच्या कालव्या मधून रब्बी हंगामाचे आवर्तन २० जानेवारी पासून तर भीमा नदीत १९ जानेवारीपासून पाणी सोडले जाणार आहे. कालवा सिंचन आवर्तनासाठी साधारणपणे ६ टीएमसी पाणी तर भीमा नदीत साधारणपणे ५.५ टीएमसी एवढे पाणी सोडले जाणार आहे.

डी.बी साळे,

अधीक्षक अभियंता,

लाभक्षेत्र प्राधिकरण, सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!