महाराष्ट्र

महाळुंग ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवावा.- तहसिलदार जगदीश निंबाळकर.

महाळुंग ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज न भरण्याचा निर्णय.

टीम विजयदिप न्यूज.

महाळुंग (ता.माळशिरस) येथील ग्रामस्थांनी यमाईदेवी प्रांगणात तातडीची बैठक बोलावुन सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कोणीही ग्रामस्थांनी व पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरावयाचा नाही व ग्रामपंचायतीचे लवकरात-लवकर नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. याबाबत माळशिरस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी बहिष्कार घालू नये व निवडणूक लढवावी असे आवाहन माळशिरसचे तहसिलदार जगदीश निंबाळकर यांनी महाळूंग ग्रामस्थांना केले आहे.

तसेच या संदर्भात निवडणुक आयोगाला राज्य सरकारने संदर्भ जा.क्र.MUN-0-२०२०, प्र.क्र.४१५/नवि१८ नुसार दि.१६ डिसेंबर २०२० रोजी महाळुंग ग्रामपंचायतीची निवडणुक स्थगित करण्यात यावी अशा आशयाचे पत्र पाठविण्यात आले होते. असे असतानाही निवडणुक आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे सद्याची ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरु आहे.
गावच्या हितासाठी म्हणून नगरपंचायत व्हावी तसेच सध्याची निवडणूक लढविल्यामुळे वेळ, पैसा तसेच  सरकारला देखील आर्थिक भार पडणार आहे. म्हणून सर्व गावकरी, पार्टी प्रमुख यांनी सध्याची ग्रामपंचायत निवडणूक न लढविण्याचा व कोणीही निवडणुकीसाठी अर्ज न भरण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे.

महाळूंग ग्रामस्थांचे निवेदन मिळालेले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आले आहे. सर्व प्रक्रिया नियमांना धरून होईल. ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवावा व निवडणुकीवरती बहिष्कार घालू नये. जगदीश निंबाळकर, तहसिलदार, माळशिरस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!