धरण पाणीसाठा

नीरा नदीला पुरस्थिती निर्माण होणार.

वीर मधून विसर्ग वाढवला.

टीम विजयदिप न्यूज.

वीर धरणाच्या वरील भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून या सर्व धरणाच्या सांडव्यामधून विसर्ग सुरू असून हा सर्व विसर्ग वीर धरणात येत आहे परिणामी वीर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे काल दु. २ वा. पासून वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असून पावसाचे प्रमाण व धरणात येणार्‍या पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज मंगळवारी पहाटे ४ वा. वीर धरणामधून सोडण्यात येत असलेला विसर्ग आणखी वाढवून ३२ हजार ४५९ क्यूसेक्स करण्यात आला आहे.

वीर धरण काल दु.२ वा. १०० टक्के भरले होते त्यामुळे वीर धरणाच्या सांडव्यातून काल दु.२ वा. ४ हजार ६३७, ४ वा. ९ हजार २७४, सायं. ५ वा. १३ हजार ९११, सायं. ६ वा. २३ हजार १८५ क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यात आज मंगळवार पहाटे ४ वा. वाढ करून तो ३२ हजार ४५९ क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाने केले आहे.

संभाव्य पर्जन्यमान व धरणात सोडला जात असलेला विसर्ग यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा व भीमा नदी पात्रात कोणीही जाऊ नये अशा प्रकारे सतर्कतेचा इशार प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.

नीरा प्रणालीमधील धरणामधील पाणीसाठे व सोडण्यात येत असलेला विसर्ग दर्शविणार तक्ता.

धरणपाणीसाठा (टीएमसी)टक्केवारीपाऊस (मी.मी)विसर्ग
गुंजवणी३.६६९९.३८३३९९८ क्युसेक्स
भाटघर२३.५०१००३१५८२४ क्युसेक्स
नीरा-देवघर११.७२१००६६५११० क्युसेक्स
वीर९.४०१००३२४५९ क्युसेक्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!