श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्या’कडून सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज बँकेत वर्ग.- चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक

पांडुरंग सहकारी’कडून १ लाख ११ हजार २७३ मे.टन ऊस गाळप.

विजयदिप न्यूज.
श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याजाची रक्कम द.सा.द.शे.८ टक्के प्रमाणे ९४ लाख रुपये ठेवीदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी दिली, योवळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक म्हणाले की, कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. आदरणीय स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी प्रत्येक वर्षी दिवाळी सणासाठी व्याज बिल देऊन आदर्श निर्माण केला होता. त्याचप्रमाणे यावर्षीही सभासदांच्या बँक खात्यात व्याज बील जमा केले आहे. त्यामुळे ठेवीदारांची दिपावली गोड होणार आहे. असेही ते म्हणाले.
कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले की, चालू गळीत हंगाम २०२०-२१ हा नुकताच सुरु झालेला असून कारखाना जास्तीत जास्त गाळप करणार आहे. कारखान्याने १२ लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ठ ठेवले आहे व व्यवस्थापनाच्या मदतीने ते पूर्ण करणार आहे. कारखान्याने गत हंगामातील एफआरपी प्रमाणे ऊस बिलाचे संपुर्ण रक्कम अदा केलेले आहे. तसेच तोडणी व वहातुक ठेकेदारांच्याही संपूर्ण देय रक्कमा वेळेवर अदा केल्या आहेत. कारखाना चालू हंगामात सुरुवातीपासून सातत्यपूर्ण गाळप करीत आहे. कारखान्याचे को-जनरेशन व डिस्टीलरी प्रकल्पही व्यवस्थीतपणे सुरु आहेत. को-जनरेशन मधून जास्तीत जास्त विज उत्पादन करण्याचा व डिस्टीलरी प्रकल्पातूनही जास्तीचे उत्पादन घेण्याचा कारखान्याचा मानस आहे. चालू हंगामात कारखान्याने आज अखेर १ लाख ११ हजार २७३ मे.टन ऊस गाळप केला असून ९३ हजार १२५ क्विंटल साखर उत्पादन केली आहे. को-जनरेशन प्रकल्पामधून ६३ लाख युनिट विज निर्मीती केली आहे. तसेच डिस्टीलरी प्रकल्पातूनही ७ लाख लिटर उत्पादन घेतले असून बी हेवीचे ४ लाख लिटरचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे कारखान्याचा साखर उतारा कमी दिसत असून बी हेवी मोलॅसीस सह सध्या कारखान्याचा साखर उतारा १०.०१ टक्के इतका आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद अनामतधारक व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्यास गत हंगामात ऊस गाळपास दिला आहे, अशा ऊस उत्पादकांना त्यांच्या रक्कमेच्या प्रमाणात साखर घर पोहोच केलेली आहे. या हंगामात तोडणी वहातुक करणेसाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कारखाना स्थळावर आलेली असून कारखान्यास ऊसाचा सुरळीत पुरवठा सुरु आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरभाऊ मोरे, दिलीपराव चव्हाण, हरिषदादा गायकवाड, शिवाजीराव साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, सुरेश आगावणे, बाळासो यलमार, तानाजी वाघमोडे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, दिनकरराव कवडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, नागन्नाथ शिंदे, सांगिता पोरे, पार्वती नरसाळे, सिंधू पवार, भिमराव फाटे, अरुण घोलप आदि उपस्थित होते.