महाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध मागण्यांसाठी मळोली येथे आंदोलन.

स्वाभिमानीचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.

विजयदिप न्यूज.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज गुरुवारी सकाळी अकलूज-सांगोला रोडवर मळोली (ता.माळशिरस) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने शेतकरी विरोधी केलेले कायदे रद्द करावेत, केंद्र शासनाने शेतकरी विरोधातील जे कायदे केले आहेत या कायद्यामुळे शेतकऱ्यांना काही कंपन्यांचे गुलाम बनुन रहावे  लागेल. तसेच ऊस गाळप हंगाम २०२०/२१ साठी माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर (एफआरपी) जाहीर न करताच ऊस गाळप चालु केले आहे. या कारखानदारांनीअगोदर ऊसदर जाहीर करावा. 

तसेच तालुक्यातील काही साखर कारखान्यांनी मागील ऊसबिले (एफआरपी) अध्यापही दिलेली नाही. तरी ऊसदर कायद्यानुसार सदर कारखान्याच्या संचालक मंडळावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत व शेतकऱ्यांना थकीत ऊसबिले त्वरीत जमा करावित. अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. मागण्याचे निवेदन वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी स्वीकारले.

उपस्थित शेतकर्‍यांना मदनसिंह जाधव, कमलाकर देशमुख, अजित बोरकर, शिवाजी चव्हाण,  मगन काळे, प्रदीप ठवरे यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने-देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, युवा आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष अमरसिंह देशमुख, तालुकाध्यक्ष अजित बोरकर, ज्येष्ठ नेते मगन काळे, तालुकाध्यक्ष शिवाजी चव्हाण, अनंतराव मदने, सचिन पवार, विनोद गाढवे, शिवराम गायकवाड, प्रदीप ठवरे-पाटील, नितीन जाधव, बलभीम जाधव, अहील पठाण, विजय वाघबरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

रस्ता रोको दरम्यान वेळापुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि दिपक जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!