महाराष्ट्र

लग्नमंडपात नवरा-नवरीचे अनोख्या पद्धतीने आगमन.

वावर हाय! तर पावर हाय!

विजयदिप न्यूज.

            लग्नविधीची सर्व तयारी करून नवरा-नवरीस लग्नमंडपात आणण्याचे निमंत्रण दिले. आणि नवरा-नवरीचे लग्न मंडपात आगमन चक्क ट्रॅक्टर वरती बसून झाले. आणी सर्व वराडी बघतच राहिले.

      अशा प्रकारचा विवाह सोहळा विजयवाडी (ता.माळशिरस) येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पंढरीनाथ इंगळे यांची कन्या तृप्ती हिचा विवाह बोराटवाडी (ता.इंदापूर) येथील ज्ञानदेव शंकर निंबाळकर यांचा मुलगा सुहास यांच्याबरोबर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

      शेतकर्‍याला बळीराजा म्हणून संबोधतात परंतु या राजाच्या विवाहाची ज्यावेळेस वेळ येते तेव्हा शेतकरी नवरा नको ग बाई म्हणत अनेक मुली शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्यास नकार देतात. परंतु वावर हाय! तर पावर हाय! या शब्दांप्रमाणे विजयवाडी (ता.माळशिरस) येथील शेतक-याच्या मुलीने सरकारी नोकरदार व व्यापारीपेक्षा शेतकरी मुलाबरोबर लग्न करणे पसंत केले आहे.

अप्रतिम व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा.

            दोन्ही घराण्याचा पारंपारिक शेतीचा व्यवसाय आहे. आजकाल  शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी मुलाकडे मुली लग्नासाठी पाठ फिरतात. हे नवविवाहित दोघे ही पदवीधर आहेत.

            या नवविवाहितांना आशिर्वाद देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, आशिष(मामा) खराडे-पाटील, जनसेवा सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले-देशमुख, विजयवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय जगन्नाथ इंगळे, अॅड.शहाजीराव इंगवले-देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!