शेतकर्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळवून देण्याचे काम संचालक मंडळ व कामगारांचे- उमेश परिचारक.

टिम: विजयदिप न्यूज.
ऊस पुरठादार शेतकर्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळवून देण्याचे काम संचालक मंडळ व कामगारावरती आहे. तसेच पुढील गळीत हंगामात कारखान्याची गाळप क्षमता प्रति दिन १० हजार मे.टन एवढी करण्याचे धोरण निश्चित झाले असून आपण त्या दृष्टीने चाललो आहे. असे प्रतिपादन युटोपियन कारखान्याचे चेअरमन व पांडुरंगचे संचालक उमेश परिचारक यांनी केले. ते श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रशांत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे होते त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन क्रीडा महोत्सवाचा ध्वज फडकवण्यात आला.
पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, जिल्ह्यात सर्वात जास्त साखर उतारा व दर ‘पांडुरंग सहकारी’चा असून कारखान्याचा कामगार देखील सदन आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी ३० वर्षाचा कालावधी लागला यात सर्वात मोठे योगदान कारखान्याचे संस्थापक माजी चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांचे असून त्यांचे कारखान्याचा कारभार काटकसरीने चालवण्याचे धोरण महत्वाचे आहे. कै.सुधाकरपंत परिचारक यांनी पांडुरंगचा कारभार काटकसरीने चालवून साखर उतारा चांगला ठेवला त्यामुळेच आज कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांना चांगला दर दिला जात आहे व कारखान्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच कारखान्याला राज्यपातळीवर व देशपातळीवरचे पुरस्कार मिळाले असेही परिचारक म्हणाले.
क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन उमेश परिचारक आणि अरुण सुगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच खो-खो खेळामध्ये राज्य व देशपातळीवर सुयश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा उमेश परिचारक, अरुण सुगावकर, कैलास खुळे, दिनकर भाऊ मोरे, डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी हे आपल्या प्रस्तावनेत म्हणाले की, हा क्रिडामहोत्सव तीन दिवस चालणार असुन यामध्ये क्रिकेट, सुरपाट्या, हॉलीबॉल, रस्सीखेच आदि स्पर्धांचे अयोजन केले असुन कामगारांनी एकत्रित खेळल्याने त्यातुन सांघिक भावना व चैतन्य निर्माण होते आणि आपुलकी निर्माण होते.
कार्यक्रमाला व्हा.चेअरमन कैलास खुळे, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक बाळासाहेब यलमार, तानाजी वाघमोडे, विजय पाटील, अशोक चव्हाण, नगरसेवक नानासाहेब मुंडफणे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल जाधव, तानाजी भगत, संजय मुंडफणे, प्रकाश नवगिरे, अल्लाबक्ष शेख, भाऊसाहेब कुलकर्णी, मोहसीन पठाण, अनिल मुंडफणे, राजेंद्र वाळेकर, आरपीआयचे नरेंद्र भोसले, वीरेंद्र पाटील, विक्रमसिंह लाटे, मौला पठाण कारखान्याचे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कामगार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कै.सुधाकरपंत परिचारक यांनी काटकसरीने कारखाना चालविण्याचे धोरण अवलंबलेले होते. मोठ्या मालकांची शिस्त आम्ही जवळून अनुभवली आहे. त्यांनी कारखान्याची कोणतीही वस्तु स्वत: वापरली नाही व इतरांनाही वापरुन दिली नाही व ते त्यांना चालत नव्हते त्यांच्या काटकसरीच्या धोरणामुळेच आपल्या कारखान्याला राज्य व देश पातळीवरचे सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाले आहेत.
उमेश परिचारक.