नीरा खोर्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ.

नीरा खोर्यातील ४ धरणात मिळून १४.३७ टीएमसी पाणीसाठा.
टिम: विजयदिप न्यूज.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, पंढरपूर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा व पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर या तालुक्यातील शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या व औद्योगिक वापराच्या पाण्यासाठी महत्वाच्या असणार्या निरा खोर्यातील गुंजवणी, भाटघर, निरा-देवघर व वीर या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे या सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
आज सोमवार ११ जुलै रोजी स.६ पर्यंत या चार धरणांमध्ये एकूण पाणीसाठा १४.३७ टीएमसी एवढा झालेला असून सर्व धरणातील पाण्याची एकूण सरासरी टक्केवारी २९.६७ टक्के एवढी झालेली आहे. लवकरच ही धरणे ५० टक्याचा आकडा पार करतील.
गत वर्षी ११ जुलै २०२१ रोजी नीरा खोर्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणात १२.५० टीएमसी एवढा पाणीसाठा होत त्या तुलनेत आज सोमवार ११ जुलै २०२२ रोजी या चार धरणात एकूण १४.३७ टीएमसी एवढा पाणीसाठा झालेला असून तो मागील वर्षीच्या तुलनेत १.८७ टीएमसी एवढा जास्त आहे.
नीरा खोर्यातील धरणांची सद्यस्थिती दर्शवणार तक्ता
