‘पांडुरंग सहकारी’ मध्ये पर्यावरण दिनानिमित्त १ हजार वृक्षांची लागवड.


टीम विजयदिप न्यूज.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लॉकडाऊन संचारबंदीचे सर्व नियम काटेकोर पाळून, सोशल डिस्टन्स ठेवून श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या आवारात कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व संचालक यांच्या हस्ते वृक्षारोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम हा इतर कारखान्यांना प्रेरणादायी असून प्रत्येक कारखान्याने याप्रमाणे वृक्ष लागवड केल्यास निसर्गाचा समतोल राखल्यास मदत होईल. अशी इच्छा कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगिातले की, यावर्षी देखील ५ जून हा दिवस जागतीक पर्यावरण दिन Ecosystem Restoration या उद्बोधीक घोषवाक्याने साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार पर्यावरणाच्या वाढीचा समतोल पर्नस्थापित करणेकरीता पारंपारिक उर्जा स्त्रोत निर्माण करणे, वायु प्रदुषन रोखने इत्यादीकरीता वृक्ष लागवड, बायो-डिझेल, बायो-गॅस, इथेनॅालचा वापर इत्यादी प्रमुख बाबीवर भर देणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे, पर्यावरण विषयी जनतेत जागरूकता निर्माण व्हावी व पोषक वातावरणाची निर्मीती व्हावी हा पर्यावरण दिनाचा मुख्य हेतू असतो. मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेप वाढत चालला असून संपुर्ण विश्वातील दळणवळणामुळे वाढता पसारा, वाढते औद्योगिकीकरण यामुळे मृदावरण, जीवावरण, जलावरण, वातावरण या सर्व घटकांवर परिणाम होवून प्रदुषणारासारखे गंभीर प्रश्न निर्माण होवू लागले आहेत. पर्यावरणाचे महत्व समजावे म्हणून युनायटेड नेशन एन्वायरमेंट प्रोटेक्शन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने जागतीक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे आवश्यक असून पर्यावरण विषयक एकसंघ आणि संतुलित दृष्टीकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण केला जात आहे .
श्री पांडुरंग कारखाना प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन वृक्ष लागवड करून साजरा करित असून आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखाना व परिसरात सुमारे १ हजार विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. आजपर्यत कारखान्याने सुमारे २० हजार वृक्षांची लागवड केली असून यामध्ये वड, आंबा, जांबूळ, लिंब, चिंच, नारळ, पिंपळ इ. वृक्षांचा समावेश आहे. सदरचे वृक्ष अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासले जात आहेत. कारखान्याने वृक्षारोपन करताना ज्या वृक्षाचा निसर्गास समतोल राखणेसाठी उपयोग होवून त्यापासून कारखान्याचाही अर्थीक फायदा होईल अशा आंबा, जांबूळ, चिंच, नारळ या झाडांची लागवड केल्याने त्यापासून सध्या उत्पन्नही मिळण्यास सुरूवात झाली आहे.
मागील काही वर्षीमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे पिण्याच्या पाण्याची कमतरता असतानाही अगदी कमी पाण्यात योग्य नियोजन करुन इतक्या मोठया प्रमाणातील वृक्षांची कारखान्याने चांगली जोपासना करुन झाडे जगवली आहेत.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतराव देशमुख, युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक, संचालक दिनकरभाऊ मोरे, हरिषदादा गायकवाड, शिवाजीराव साळुंखे, ज्ञानदेव ढोबळे, सुरेश आगावणे, बाळासोा यलमार, तानाजी वाघमोडे, महीबुब शेख, नामदेव झांबरे, दिनकरराव कवडे, आनंदराव आरकिले, परमेश्वर गणगे, नागन्नाथ शिंदे, भिमराव फाटे, अरुण घोलप, दाजी पाटील आदि उपस्थित होते.