आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विविध मागण्यांची निवेदने.

विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुका व सोलापूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण रस्त्यांच्या बाबतीत बदल व विकास करण्यासंदर्भात आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना विविध मागण्यांची निवेदने दिली आहेत. यासंदर्भात योग्य ते निर्णय घेतले जातील असा शब्द केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपणास दिला असल्याचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्गांच्या भुमिपुजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने सोलापुर दौऱ्यावर आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापुर येथे स्वागत करुन विविध रस्त्यांच्या कामाबाबत चर्चा केली. आणि त्या संदर्भात निवेदने सादर केली. याप्रसंगी माळशिरस विधानसभा आ.राम सातपूते, अकलूज चे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदार, माजी आमदार उपस्थित होते.
आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या मागण्या खालील प्रमाणे
१. | संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील कि.मी १०८ ते १३० मध्ये अकलुज बाह्यवळण रस्त्यावर निरा नदीवरील मोठ्या पुलाच्या पोहच मार्गामध्ये जुना तांबवे रस्त्याला जोडणारा बोगदा मिळवावा. |
२. | माळीनगर साखर कारखान्याच्या मुख्य गेटसमोर व ऊस यार्डाच्या समोर असे दोन बोगदे करण्यात यावेत. |
३. | ऊस वाहतुक लक्षात घेता महाळुंग येथील बोगद्याची उंची वाढवण्यात यावी. |
४. | बोरगाव बाह्यवळण रस्त्यावर दोन बोगद्याला जोडुन वाहतुक सुरळीत होण्यासाठी सर्विस रोड करण्यात यावा. |
५. | संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या बोंडले येथे एकत्र येतात त्या चौकात बांधकाम करुन सुशोभिकरण करण्यात यावे. |
६. | गट नं. २ ते श्रीपुर-बोरगाव (जुन्या) संत तुकाराम महाराज पालखीमार्गाचे दिड मिटरने रुंदीकरण करुन सदर मार्गाचे मजबुतीकरण करण्यात यावे. |
७. | अकलुज ते वेळापुर रस्ता केंद्रीय राखीव निधी योजनेत मध्ये समाविष्ट करुन ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्द करुन देण्यात यावा. |
८. | करमाळा-माढा तालुक्यातील रोपळे-केम-वडशिवणे-कंदर-कन्हेरगाव या बारा क्रमांकांच्या प्रमुख जिल्हा मार्गाचाही केंद्रीय राखीव निधी योजनेत समावेश करावा व त्यास ७५ कोटींचा निधी मिळावा . |
९. | पुणे-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी करण्यात यावा. |
१०. | संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग यांना जोडणारा अकलुज- वेळापुर रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यात यावा. |
११. | नातेपुते शहरामधील शिंगणापुर चौक ते मांडवे बायपास कॉर्नरचे मजबुतीकरण करण्यात यावे. |
१२. | नातेपुते शहरामधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक ते पुर्व बाजुचा नाला येथे बंदिस्त गटार व पेव्हींग ब्लॉक बसवण्यात यावेत. तसेच शहरामधील डॉ.मोरे हॉस्पिटल ते पुर्वबाजुचा नाला येथे बंदिस्त गटार व पेव्हींग ब्लॉक बसवण्यात यावेत. |
१३. | नातेपुते शहरामध्ये संत ज्ञानेश्वर पालखीमार्गावर डिव्हायडर बसवुन त्यावर स्ट्रिट लाईट बसवण्यात याव्यात. |