इतर

उजनीमधून कालव्यास आवर्तन सोडणार.

रब्बी हंगामातील आवर्तनात एकूण ११.१० टीएमसी पाण्याचा वापर.

टिम: विजयदिप न्यूज.

उजनी जलाशयामधून उजनी उजवा व डावा कालव्यास तसेच भीमा-सिना जोड कालव्यास रब्बी हंगामाचे आवर्तन २८ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय शुक्रवार २१ जानेवारी रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून कालवा सल्लागार समितीची बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली.

या बैठकीस आ.बबनराव शिंदे, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.संजय शिंदे, आ.समाधान आवताडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त शिवशंकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह.तु. धुमाळ, लाभक्षेत्र प्राधिकरण, अधीक्षक अभियंता डी.बी. साळे, कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे, भीमा विकास विभागचे कार्यकारी अभियंता आर.एन. क्षीरसागर यांच्यासह पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील कालवा सल्लागार समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनी कालवा, भीमा-सिना जोड कालवा (बोगदा) यामधून २८ जानेवारी २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधी रब्बीचे आवर्तन सोडले जाणार असून या आवर्तनात कालव्यास ५ टीएमसी तर भीमा-सिना जोड कालवा (बोगदा) १.५० टीएमसी. एवढे पाणी सोडले जाणार आहे. तसेच भीमा नदीला पाणी मागणी, त्यावेळची परिस्थिति व पाणीसाठयाची स्थिती पाहून २५ फेब्रुवारी नंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

रब्बी हंगामात पाणी सोडण्याचे नियोजन खालील प्रमाणे.

शनिवार २२ जानेवारो रोजी सकाळी ६ वा. उजनी जलाशयाची स्थिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!