श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा तंतोतंत.

वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने केली अचानक तपासणी.
टिम: विजयदिप न्यूज.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वजनकाट्याची आज १३ जानेवारी रोजी मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार वैद्यमापन विभाग भरारी पथकाने अचानकपणे तपासणी केली असता वैद्यमापन विभागाने पूर्वी केलेले सील जसेच्या तसे शाबूत असलेचा अहवाल वैद्यमापन समितीने दिला आहे. यावेळी भरारी पथकातील सदस्य व कारखान्याचे अधिकारी आदि उपस्थित होते.

वैद्यमापन भरारी पथकाने वजनकाटा तपासणी करुन वजन काटा तंतोतंत असल्याचा व त्यामध्ये कोणताही फेरफार नसलेचा अहवाल दिला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर असलेला विश्वास आणखीनच दृढ झाला आहे.
वैद्यमापन पथकाने सुरुवातीस कारखान्याकडील असणाऱ्या चारही काटयाची तपासणी करत एकच वाहन चारही काटयावर फिरवून वजन केले असता त्यामध्ये कोणताही फरक आढळून आला नाही. त्यानंतर काटयावर २० किलोची प्रमाणित वजने ठेवून प्रत्यक्ष वजन केले असता त्यामध्येही वजनात कोणताही फरक आढळून आला नाही.
‘पांडुरंग सहकारी’वर गेल्या २९ वर्षापासून ऊस उत्पादकांनी दाखविलेली विश्वासाहर्ता आजही काटा तपासणीने पुन्हा एकदा सिध्द केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासलेमुळे ऊस उत्पादक शेतकरी नेहमीच कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात तसेच ‘पांडुरंग सहकारी’ने सोलापूर जिल्हयामध्ये सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून नाव लौकीक मिळविला आहे. वैद्यमापन पथकामध्ये अकलूज विभागाचे निरीक्षक अंकुश इंगोले, लेखापरिक्षक श्रेणी-१, सहकारी संस्था (साखर) सोलापूर चे पी.आर.शिंदे, पुरवठा निरीक्षक एस.डी.केमकर तसेच शेतकरी भारत महाडीक (आजोती), रामचंद्र गोफणे (जैनवाडी), कारखान्याचे संगणक प्रमुख तानाजी भोसले, केनयार्ड सुपरवायझर राहुल साठे आणि वहान चालक, मालक इ. उपस्थित होते.
‘पांडुरंग सहकारी’ हा स्व.सुधाकरपंत परिचारक यांचे आदर्शानुसार चालत असून कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांचे नेतृत्वाखाली कारखाना शेतकऱ्यांचे हित जोपासत आहे. या हंगामातील उच्चांकी साखर उतारा, उच्चांकी साखर उत्पादन, शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवून अनेक विक्रम प्रस्तापित करीत आहे. मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार आज वैद्यमापन विभागाच्या भरारी पथकाकडून आलेल्या वजन काटा तपासणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावरील वजन काटयाबाबत असणारा विश्वास आणखी वाढला आहे.
डॉ.यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक.