माळशिरस तालुकाशेतीविषयकसोलापूर जिल्हा

‘पांडुरंग सहकारी’ची पंचवार्षिक निवडणूक जवळपास बिनविरोध; औपचारिकता बाकी.

विद्यमान चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक बिनविरोध होणार.

टीम: विजयदिप न्यूज.

श्रीपुर (ता. माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बुधवारी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी ३० अर्ज आले आहेत. हे सर्व अर्ज परिचारक गटातील असल्यामुळे व या अर्जातील काही अर्ज दुबार तर काही पुरक असल्याने यातील २१ अर्जच कायम राहणार आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट असून याची फक्त औपचारिकता बाकी आहे.

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजयकुमार देशमुख यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी नामनिर्देश अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी ३० अर्ज दाखल झाले आहेत.

दाखल झालेल्या ३० अर्जात उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यामधून विद्यमान चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांचा एकमेव अर्ज आलेला आहे त्यामुळे आ.परिचारक यांची संचालक मंडळावरती बिनविरोध निवड होणार आहे. तसेच महिला राखीव प्रवर्गातून दोन जागांसाठी दोनच अर्ज आलेले आहेत यामध्ये सुशिलाबाई पाटील व सांगिता साळुंखे यांचा अर्ज आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती प्रवर्गातून एका जागेसाठी एकच किसन सरवदे यांचा अर्ज आला आहे. तर उत्पादक सभासद मतदार संघातील १५ जागांसाठी चळे गटातून दिनकर मोरे, सुदाम मोरे, हरिष गायकवाड खर्डी गटातून भास्कर कसगावडे, वसंतराव देशमुख यांचे २ अर्ज, लक्ष्मण कसगावडे, उमेश परिचारक यांचे २ अर्ज, गादेगांव गटातून भगवान चौगुले, महावीर चौगुले, बाळासो यलमर, गंगाराम विभूते, करकंब गटातून कैलास खुळे, ज्ञानदेव ढोबळे, विजय जाधव, हणमंत खुळे, रोपळे गटातून दिलीप चव्हाण, लक्ष्मण धनवडे, गणेश चव्हाण, परमेश्वर गणगे, हणमंत कदम असे अर्ज आले असून इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून संतोष घोडके, भैरु वाघमारे तसेच भटक्‍या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठी तानाजी वाघामोडे, हणमंत केसकर असे एकूण २१ जागांसाठी ३० अर्ज आलेले आहेत.

निवडणूक प्रक्रिया सुरुळीत सुरू असून १२ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी घेण्याची मुदत असून या दिवशी सर्व अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

“श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुर असून नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी ३० अर्ज आले आहेत. आज अर्जाची छाननी होणार असून अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख १२ नोव्हेंबर आहे”.

डॉ.विजयकुमार देशमुख,

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!