भाजपाच्या खिशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग असेल पण त्यांच्या खिशात लोकशाही नाही- आ.रोहित पवार.

टीम: विजयदिप न्यूज.
भाजपाची कांही नेतेमंडळी देगलूर येथील पोटनिवडणुकीत जाऊन तुम्ही भाजपाला निवडून द्या ईडीचे लक्ष आहे असे म्हणत होती. परंतु देगलूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला व लोकांनी भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. भाजपाच्या खिशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग असेल पण त्यांच्या खिशात लोकशाही नाही. असा घाणाघात कर्जत-जामखेडचे आ.रोहितदादा पवार यांनी भाजपावरती केला. ते श्रीपूर-महाळूंग येथे युवक मेळाव्या प्रसंगी बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते जिल्हा नियोजन समिति सदस्य उत्तमराव जानकर, जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, दि.सासवड माळी शुगरचे एम.डी रंजनभाऊ गिरमे, राहुल रेडे-पाटील, विक्रमसिंह लाटे, लखण धुमाळ, अनिकेत मुंडफणे, मौला पठाण, बंडू वाळेकर, दादा लाटे, बापू रेडे, रावसाहेब सावंत-पाटील, राहुल खटके आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.रोहितदादा पवार म्हणाले की, मागील कांही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांच्या नेत्यांचा कुठल्या ना कुठल्या एजन्सिजचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे कांही नेते म्हणतात की, राष्ट्रवादी व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते आमच्या खिशात आहेत. परंतु त्यांच्या खिशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग असेल पण त्यांच्या खिशात लोकशाही नाही हे खरे आहे.
श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीत आपल्याला विकास करावयाचा असून आपल्याला विकास करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. येणार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला मतदार व कार्यकर्ता म्हणून आपल्या उमेदवाराला ताकद यावी द्यावयाची आहे. युवकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, कांही लोक आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील पण कुणीही किती दाबले तरी आपण ताकदीने पुढे झाले पाहिजे. श्रीपूर-महाळूंग नगरपंचायतीच्या निवडणुकीत कुठेही कमी पडू नका १७ पैकी १७ जागा आपल्या विचारांच्या निवडून आणावयाच्या आहेत. असेही आ.पवार म्हणाले. या भागातील लोक म्हणतात की, पोलिसांचा वापर केला जातोय पण कांही काळजी करू नका वळसे-पाटील साहेबांशी बोलून आपली ही गावे दुसऱ्या पोलीस स्टेशनची जोडू त्यामुळे तुमची छोटी-मोठी कामे होतील. तुमच्या अडचणी कमी होतील. तसेच आ.बबनदादांचे १४ गांवासाठी नवीन पोलीस स्टेशनसाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाळूंग येथील अंबाबाईचे मंदिर केंद्र शासनाच्या अंतर्गत आहे. केंद्र सरकार मुद्दाम करत असेल असे मी म्हणत नाही. परंतु त्या ठिकाणची नुसती वीट काढली किंवा लावली तर कारवाई होऊ शकते अशी परिस्थिती आहे. असे असले तरी आ.बबनदादांनी पाठपुरावा केला असून पवार साहेबांची त्या विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. आपल्या यमाईचे मंदिर अनेक वर्षापासून ताकदीने टिकले आहे ते आणखी सुंदर व्हावे असेही आ.रोहित पवार