उजनीच्या पाणीसाठ्यात होणार वाढ.

टीम विजयदिप न्यूज.
भीमा खोर्यात मागील आठवडा भरापासून विश्रांत घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावलेली आहे. परिणामी दौंड येथे विसर्गात वाढ होऊ लागलेली असून याचा परिणाम उजनी धरणातील पाणीपातळी वाढण्यावरती होणार आहे. उजनीत दौंड येथून येणार्या विसर्गात वाढ झालेली असलीतरीदेखील ही वाढ म्हणावी तेवढ्या प्रमाणात नसल्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत सांथगतीने वाढ होत आहे.
पुणे बंडगार्डन येथील विसर्ग मंगळवार सा.६ वा. २ हजार ९१६ क्युसेक्स एवढा कमी झालेला होता. त्यात काल बुधवारी स.६ वा. वाढ होऊन तो ११ हजार ६१ क्युसेक्स तर आज स.६ वा. १० हजार ३९१ क्युसेक्स एवढा झालेला आहे. तर दौंड येथील विसर्ग काल बुधवारी सायं ६ वा. २ हजार ९९९ क्युसेक्स एवढा कमी झालेला होता. त्यात आज गुरुवारी स.१०.३० वा. वाढ झाली असून तो ८ हजार ६३१ क्युसेक्स एवढा झालेला आहे.
आज गुरुवार २३ सप्टेंबर रोजी स.१० वा. उजनी धरणाची पाणी पातळी ४९६.०६० मी. एकूण पाणीसाठा ३०७९.१५४ द.ल.घ.मी म्हणजेच १०८.८७ टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा १२७७.०६४ द.ल.घ.मी म्हणजेच ४५.०९ टीएमसी एवढा असून धरणाची टक्केवारी ८४.१३ टक्के एवढी आहे.
भीमा खोर्यातील धरणांची स्थिती, सोडण्यात आलेला व पर्जन्यमान विसर्ग तक्ता.
