इतर
वीर मधून नीरा नदीत सोडलेला विसर्ग कमी केला.

टिम विजयदिप न्यूज.
नीरा खोर्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून नीरा नदीत वीर धरनामधून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी जास्त केला जात आहे. आज स.६ वा. वीर धरनामधून नीरा नदीत ५ हजार ३०९ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
माळशिरस, पंढरपूर, सांगोला, खंडाळा, फलटण, पुरंदर, बारामती व इंदापूर या तालुक्यातील शेती बरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेल्या नीरा खोर्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर या सर्व धरणात मिळून एकूण पाणीसाठा ३८.२८ टीएमसी एवढा झाला असून या सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ फक्त ९७ मी.मी पावसाची नोंद झालेली आहे.
गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणाची आकडेवारी खालील प्रमाणे.
मंगळवार दि.२७ जुलै रोजी स.६ वा.
धरणाचे नाव | उपयुक्त साठा (टीएमसी) | टक्केवारी | २४ तासातील पाऊस मिमी |
गुंजवणी | ३.३२ | ९०.०३ | ४४ |
भाटघर | १५.३५ | ६५.३१ | १७ |
निरा देवघर | १०.६४ | ९०.६९ | ४० |
वीर | ८.९७ | ९५.३५ | ०० |
भीमा व नीरा खोर्यातील धरणातील पाणीसाठा दर्शविणारा तक्ता
दि.२७ जुलै २०२१ स.६ वा.
