ब्रिमा सागर कारखान्यात जागतिक पर्यावरण दिन साजरा!

टीम विजयदिप न्यूज.
श्रीपुर (ता.माळशिरस) येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरी लिमिटेड, श्रीपुर कारखान्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त कारखाना परिसरात कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविक करताना कारखान्याचे उपव्यवस्थापक चंद्रकांत भागवत यांनी म्हणाले की, झाडे वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडतात व त्यामुळे हवेचे शुद्धीकरण होते. प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगविले पाहिजे आणि ही सध्या काळाची गरज आहे. ऑक्सीजनला किती महत्त्व आहे हे आपण कोरोना संक्रमणामध्ये पहात आहोत. त्यामुळे सर्वांनी संकल्प करून किमान एक वृक्ष लावला पाहिजे. ब्रिमासागर डिस्टिलरी दरवर्षी किमान चारशे ते पाचशे झाडे लावण्याचे नियोजन करीत असते असे सांगितले या कार्यक्रमाला ब्रिमा सागर कारखान्याचे अधिकारी वर्ग कामगार उपस्थित होते.