निमगाव येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त इंडो-इस्त्रायल पध्दतीने २ हजार २०० आंबा वृक्षांची लागवड.

सोलापूर जिल्हा प्रयोगशील शेतकर्यांचा वारसा लाभलेला जिल्हा.- शमा पवार.
टीम विजयदिप न्यूज.
निमगांव (ता.माळशिरस) येथील प्रगतशील शेतकरी निनाद पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिनी ४ एकर क्षेत्रामध्ये इंडो- इस्रायल पद्धतीने २ हजार २०० आंबा वृक्षांची लागवड अकलूजच्या उपविभागीय दंडाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते करून शिवराज्याभिषेक अनोख्या पध्दतीने साजरा केला.
यावेळी बोलताना शमा पवार म्हणाल्या की, सोलापूर जिल्हा प्रयोगशील, कृतीशील, प्रगतशील शेतकर्यांचा वारसा लाभलेला जिल्हा असून माळशिरस तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतीतून चांगले उत्पादन घेत आहेत. तसेच शेतकर्यांना शेतात प्रयोग करताना अनेक अडथळे येतात, शेतीत भांडवल गुंतवताना शेतकर्यांना शेतीत प्रयोग करू का नको अशा व्दिधा मनस्थितीतून जावे लागते. नवीन प्रयोग करताना कोणताही अनुभव नसताना मोठे भांडवल गुंतवले जाते तेव्हा त्यावेळस धाडस लागते ते धाडस निनाद पाटील यांनी दाखवले म्हणूनच त्यांनी या माळाचा मळा केला. आपल्या सर्वांसाठी व शेतकरी बांधवांसाठी निनाद पाटील यांनी केलेला प्रयोग दिशादर्शक ठरणार आहे.
सुरवातील जेव्हा एखादा व्यक्ती नवीन प्रयोग करण्यासाठी पुढे येतो तेंव्हा आपल्या आसापासचे लोक चर्चा करत असतात की, हा फसणार आहे व कर्जात बुडणार आहे. परंतु अशी चर्चा न करता सर्वांनी पाठींबा दिला, थोडे प्रोत्साहन दिले, व सर्वांनी मिळून मार्ग काढला तर त्याचा सर्वांना फायदा होईल असेही उपविभागीय दंडाधिकारी पवार म्हणल्या.
यावेळी युवा उद्योजक सुजयसिंह माने-पाटील, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने-शेंडगे, सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूटचे डॉ.राहुल जवंजाळ, निमगाव चे माजी सरपंच हनुमंत पवार, डॉ.अमर ढेरे, मराठा व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ सावंत, प्रगतशील बागायतदार प्रतापराव मगर, शिवामृतचे संचालक हरिश्चंद्र मगर, भारतीय जनता पार्टी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ॲड.गणेश कदम, पत्रकार विनोद बाबर, एल.डी वाघमोडे, लखन कुरुडकर, दिनेश माने-देशमुख, विजयकुमार देशमुख, नितीन मगर, शिवम कांबळे, संजय देशमुख, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वावरे आदी मान्यवर उपस्थित होते.